शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

खिळे काढल्याने झाडांच्या वेदना झाल्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:08 IST

साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली.

कल्याण : झाडांना ही संवेदना असतात. तेही सजीव आहेत. पण फक्त त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. परंतु, त्यांच्या वेदना आम्हाला ऐकू येत आहेत. त्यामुळेच त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा हट्टाहास आहे, असे सांगत ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेच्या मुंबई टीमने झाडांवरील खिळे काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या टीमने बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा सर्कल परिसरात हा उपक्रम राबवला.पुण्यातील तरुण माधव पाटील यांनी झाडांवरील खिळे काढण्यास सुरुवात केली. ‘अंघोळीची गोळी’ने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच हा उपक्रम दादर परिसरात १ एप्रिलपासून हाती घेतला. त्या वेळी शिवाजी पार्क परिसरातील झाडांचे खिळे काढण्यात आले. आमचा हा प्रयोग आजच्या पुरता मर्यादित नाही. मुंबईतील विविध भागांत तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहान या टीमने केले आहे.साधारणपणे ३० युवकांनी दोन तासांत ६० पेक्षा अधिक झाडे खिळेमुक्त केली. ठाणे, मुंबई परिसरात या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे.पाणीबचतीचा संदेश‘अंघोळीची गोळी’ ही संस्था मुंबईत पाणी बचतीचा संदेश देत आहे. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्वांवर ‘अंघोळीची गोळी’ उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगून ही संस्था शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन पाण्याचे महत्त्व पटवून देते.

टॅग्स :thaneठाणे