शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:12 IST

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. मात्र, या अभियानाचे काम करण्यास राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नकार दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे, अशी माहिती येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागात हे अभियान फसल्यात जमा असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.या अभियानातील पथकामधील अंगणवाडी कार्यकर्तीने दररोज ५० घरांना भेटी देऊन तापाची तपासणी करणे, गरज पडल्यास इतर सुविधा देणे याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रोकोविड, कोविड व पोस्टकोविड आदींचे मार्गदर्शन करावयाचे सूचित केले आहे.सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या अभियानाचे काम करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे रोजचे नियमित आहारवाटप, लसीकरण, वजन घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो, माहिती अपलोड करणे आणि दहा दिवस पोषण महिना साजरा करणे आदी कामे करावी लागणार आहेत. याशिवाय सॅम या कुपोषित बालकांच्या घरी प्राधान्याने भेटी द्याव्या लागणार आहेत. पण अंगणवाडी कर्मचारी या माणूस आहेत, रोबोट नाहीत, त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना वेळ द्यावाच लागतो. याकडे महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.दैनंदिन काम सांभाळून १२ तास तपासणी कशी करणार?अंगणवाडी सेविकांत ५० ते ५५ वयोगटातील संख्या मोठी आहे. ब्लडप्रेशर, मधुमेहाने त्या त्रस्तही असू शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी, सौम्य झालेली असू शकते. त्यांना या अभियानाद्वारे रोज ५० गृहभेटींना पाठवून कसे चालेल? इतर सर्व विभागांनी ५५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना कोविडसंबंधी कामांतून वगळलेले आहे. मग महिला बालकल्याण विभाग याचा विचार करणार की नाही? अंगणवाडी सेविकांना ५० गृहभेटी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका गृहभेटीसाठी सुमारे २० मिनिटे म्हणजेच ५० गृहभेटी पूर्ण करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. म्हणजे, त्यांना नित्याचे काम व पोषण आहाराचे काम सांभाळून, सुमारे १० ते १२ तास विनामूल्य काम करावे लागेल, त्यामुळे या अभियानाचे काम करणे हे त्यांच्यासाठी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.५० घरांना भेटी दिल्यानंतर बालकांना संसर्गाची भीतीकोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कंटेनमेंट झोन रोज वाढत आहेत, अशा कठीण जोखमीच्या अवस्थेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५० घरांना भेटी दिल्यावर पुन्हा अंगणवाडीत नियमित कामे करावयाची म्हटले तर छोटी मुले, गरोदर व स्तनदा माता या अतिसंवेदनशील गटात त्यांना मिसळावे लागेल. जर या गटाला अंगणवाडी कर्मचाºयांमुळे संसर्ग लागलाच तर जबाबदार कोण? स्थानिक जनतेच्या रोषाचा पहिला बळी अंगणवाडी कर्मचारी ठरतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस