शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:12 IST

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ अभियान हाती घेतले आहे. मात्र, या अभियानाचे काम करण्यास राज्यातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नकार दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री, महिला बालविकास मंत्र्यांना निवेदनाद्वारे सूचित केले आहे, अशी माहिती येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी दिली. यामुळे ग्रामीण भागात हे अभियान फसल्यात जमा असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.या अभियानातील पथकामधील अंगणवाडी कार्यकर्तीने दररोज ५० घरांना भेटी देऊन तापाची तपासणी करणे, गरज पडल्यास इतर सुविधा देणे याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रोकोविड, कोविड व पोस्टकोविड आदींचे मार्गदर्शन करावयाचे सूचित केले आहे.सुमारे ४० दिवस चालणाऱ्या या अभियानाचे काम करून अंगणवाडी सेविकांना त्यांचे रोजचे नियमित आहारवाटप, लसीकरण, वजन घेणे, गृहभेटी, पालकांच्या ग्रुपवरून मार्गदर्शन, शक्य तिथे मुलांशी संवाद, सीएएसवर फोटो, माहिती अपलोड करणे आणि दहा दिवस पोषण महिना साजरा करणे आदी कामे करावी लागणार आहेत. याशिवाय सॅम या कुपोषित बालकांच्या घरी प्राधान्याने भेटी द्याव्या लागणार आहेत. पण अंगणवाडी कर्मचारी या माणूस आहेत, रोबोट नाहीत, त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना वेळ द्यावाच लागतो. याकडे महिला व बालकल्याण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.दैनंदिन काम सांभाळून १२ तास तपासणी कशी करणार?अंगणवाडी सेविकांत ५० ते ५५ वयोगटातील संख्या मोठी आहे. ब्लडप्रेशर, मधुमेहाने त्या त्रस्तही असू शकतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी, सौम्य झालेली असू शकते. त्यांना या अभियानाद्वारे रोज ५० गृहभेटींना पाठवून कसे चालेल? इतर सर्व विभागांनी ५५ वर्षांवरील व आजारी व्यक्तींना कोविडसंबंधी कामांतून वगळलेले आहे. मग महिला बालकल्याण विभाग याचा विचार करणार की नाही? अंगणवाडी सेविकांना ५० गृहभेटी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एका गृहभेटीसाठी सुमारे २० मिनिटे म्हणजेच ५० गृहभेटी पूर्ण करण्यासाठी एक हजार मिनिटे लागतील. म्हणजे, त्यांना नित्याचे काम व पोषण आहाराचे काम सांभाळून, सुमारे १० ते १२ तास विनामूल्य काम करावे लागेल, त्यामुळे या अभियानाचे काम करणे हे त्यांच्यासाठी अव्यवहार्य व अशक्य असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.५० घरांना भेटी दिल्यानंतर बालकांना संसर्गाची भीतीकोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कंटेनमेंट झोन रोज वाढत आहेत, अशा कठीण जोखमीच्या अवस्थेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ५० घरांना भेटी दिल्यावर पुन्हा अंगणवाडीत नियमित कामे करावयाची म्हटले तर छोटी मुले, गरोदर व स्तनदा माता या अतिसंवेदनशील गटात त्यांना मिसळावे लागेल. जर या गटाला अंगणवाडी कर्मचाºयांमुळे संसर्ग लागलाच तर जबाबदार कोण? स्थानिक जनतेच्या रोषाचा पहिला बळी अंगणवाडी कर्मचारी ठरतील, अशी भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस