शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

माझे कुटुंब... मोहिमेसाठीही ठाण्यात शिक्षकांकडून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:30 IST

संतप्त भावना : अध्यादेशात शिक्षकांचा उल्लेख नाही, कार्यमुक्त करण्याची मागणी

स्रेहा पावसकर।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एप्रिलपासून सुरू झालेले कोविड सर्वेक्षणाचे काम अपुऱ्या सोयीसुविधा असतानाही शिक्षक अद्याप करत आहेत. त्यातच नव्याने सुरू झालेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठीही ठाणे महापालिका शिक्षकांनाच काम करायला लावत आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार यात शिक्षकांचा उल्लेखच नाही, तरीही ठाणे महापालिका मात्र आमच्याकडून काम करून घेऊन अन्याय करत आहे, अशा भावना ठाण्यातील संतप्त शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.महापालिका आणि नंतर खाजगी शाळेच्या शिक्षकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम दिले होते. वाहतुकीची सोय नसताना जीवावर उदार होत शिक्षकांनी ते सर्वेक्षण केले. सर्वेक्षण करणाºया शिक्षकांची कोविड चाचणीही केली नाही. दरम्यान, ठाण्यातील ७0 ते ८0 शिक्षक कोरोना पॉझिटिव्हसुद्धा झाले. तर, चार ते पाच शिक्षकांचा विविध कारणांनी मृत्यूही झाला. अन्य महापालिकांनी आपल्या सर्व शिक्षकांची या कामातून मुक्तता केली, पण ठाणे महापालिकेने मात्र ५५ वर्षांवरील आणि आजारी असणाºया शिक्षकांनाच या कामातून वगळले. उर्वरित शिक्षक हे काम करतच आहेत. आता शासनाची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम नव्याने सुरू झाली आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार या मोहिमेसाठी गृहभेटी देणाºया पथकात एक आरोग्य कर्मचारी व दोन स्थानिक स्वयंसेवक असणे गरजेचे आहे. मात्र, ठाणे महापालिका हद्दीत या मोहिमेसाठीही शिक्षकांचाच वापर केला जात आहे. शिक्षकांकडून करवून घेतल्या जाणाºया या अतिरिक्त कामामुळे त्यांच्या शालेय कामकाजावर परिणाम होत आहे. मात्र, तरीही शिक्षकांकडून हे काम करवून घेतले जात आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. इतर महापालिकांप्रमाणे ठाणे महापालिकेनेही शिक्षकांची या कामातून मुक्तता करावी, अशी मागणी शिक्षकवर्ग सातत्याने करत आहे.ठाण्यातील महापालिका आणि खाजगी शाळांचे मिळून अजूनही हजार ते बाराशे शिक्षक या सर्वेक्षणाच्या कामात अडकलेले आहेत. नव्या मोहिमेत शिक्षकांचा उल्लेखही नसताना ठाणे महानगरपालिका त्यांचा वापर करून घेत आहे. हे चुकीचे आहे. आमच्या उर्वरित सर्व शिक्षकांना तत्काळ या सर्व कामातून मुक्त करावे.- ज्ञानेश्वर परदेशी, अध्यक्ष,ठाणे महानगरपालिकाप्राथमिक शिक्षकसेनामहापालिका शाळांचे शिक्षक हेदेखील महापालिकेचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे नव्या मोहिमेचे शिक्षकांना काम दिले आहे. मात्र, शिक्षकांना या कामातून कधी पूर्ण मुक्त केले जाईल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील अधिकारीच घेतील. तेच याबाबत सांगू शकतील.- राजेश कंकाळ,शिक्षणाधिकारी, ठाणे महानगरपालिका

टॅग्स :tmcठाणे महापालिका