शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आॅनलाइन प्रक्रियेतून जावेच लागेल, बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 01:54 IST

सुधाकर देशमुख : बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा विषय, पूर्ण दंड भरलेल्यांना मिळणार सूट

उल्हासनगर : बांधकामे नियमित करण्यासाठी सर्वांना आॅनलाइन प्रक्रियेतून जावेच लागणार, असा पवित्रा पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. यापूर्वी बांधकामे नियमित करण्यासाठी सादर केलेल्या २२ हजार प्रस्तावधारकांनाही दिलासा नसून ज्यांनी पूर्ण दंडाची रक्कम भरली, अशा ८३ जणांना मात्र आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून सूट दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत आॅनलाइन अर्ज दाखल करावे लागतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे प्रक्रियाच वादात सापडली आहे. अध्यादेशाचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम राबवून अर्ज दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले.मात्र, राजकीय नेत्यांनी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी सरकारकडे केली असून खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, ८८५ प्रकरणांतील ४० बांधकामांना पाडकाम कारवाईच्या नोटिसा दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची तयारी दर्शविल्याचे आयुक्तांनी सांगितले.शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा अध्यादेश २००६ मध्ये लागू झाल्यानंतर फक्त ९८ बांधकामे नियमित झाली. तर, २२ हजार प्रस्ताव अद्याप धूळखात आहेत. त्यातील अनेकांनी टप्प्याटप्प्यांनुसार दंडाची रक्कम पालिकेकडे जमा केली. तसेच पूर्ण रक्कम भरलेल्या ८३ जणांना आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून आयुक्तांनी वगळले आहे. ज्यांनी अर्धी व टप्प्याटप्प्यांनी दंडाची रक्कम भरली, त्यांनाही आॅनलाइन अर्जप्रक्रियेतून जावे लागणार असल्याचे आयुक्त म्हणाले.महापालिकेत धूळखात पडलेल्या २२ हजार प्रस्तावांची नव्याने छाननी करून नियमात बसतील, अशांची बांधकामे नियमित करावीत तसेच ज्यांचे प्रस्ताव अर्धवट असतील, त्यांचे पुन्हा नव्याने प्रस्ताव मागवून बांधकाम नियमित प्रक्रियेत ठेवण्याची मागणी होत आहे.मुदतवाढीसाठी खासदारांचे प्रयत्नआतापर्यंत १० टक्के नागरिकांनीही अध्यादेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही. सर्वांना अध्यादेशाचा लाभ मिळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत आॅनलाइन अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर