शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:48 IST

मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत.

- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाज समाधानी आहे.मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. त्यानुसार ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर पाच दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील धार्मिक कार्य पूर्ण करु न मतदानाला कधी, कसे जायचे ही समस्या किमान महाराष्ट्रातील मतदारांना तरी भेडसावणार नाही. त्यामुळे मतदानाच्या तारखांबाबत राज्यातील मुस्लिम समाज समाधानी आहे. ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यादरम्यान मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनीही विनाकारण या बाबीचा उहापोह न करता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी केले आहे.रमजान महिना सुरु होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु देशातील ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यामध्ये मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनी लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. तारखांबाबत नाहक गाजावाजा करु नये.- हजरत मोईनउद्दीन उर्फमोईनमिया मुस्लिम समाज धर्मगुरूरमजान महिना सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होत आहे, याबाबत समाधानी आहे. वार्षिक सुट्टया सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.- आशरीन राऊत नगरसेविका, ठामपारमजानच्या महिन्यांमध्ये मतदान आले असते तरी फरक पडला नसता. जेथे रमजान महिन्यात मतदान होणार आहे, त्या राज्यातील काही जण विनाकारण तारखांबाबत वाद निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात रमजानपूर्वी मतदान होत आहे, ही समाधानाची बाब आहे. - परवेझ खान, सामाजिक कार्यकर्ताराज्यातील मतदानाच्या तारखा योग्यच आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजावून नंतरच त्यांच्या मूळ गावी जावे.- अबू फैसल चौधरी, सरचिटणीस, मिल्ली तारीख संघटना

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानMuslimमुस्लीम