शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

मुरबाड रेल्वेलाही ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:40 IST

खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुरबाड येथे दीड वर्षापूर्वी कल्याणहून मुरबाडमार्गे नगर रेल्वेची घोषणा केली. त्यानंतर कल्याण-मुरबाड मार्गाचे फक्त सर्वेक्षण झाले.

मुरलीधर भवार कल्याण : खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुरबाड येथे दीड वर्षापूर्वी कल्याणहून मुरबाडमार्गे नगर रेल्वेची घोषणा केली. त्यानंतर कल्याण-मुरबाड मार्गाचे फक्त सर्वेक्षण झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदही न केल्याने ही रेल्वे बासनात गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. टिटवाळामार्गे ही रेल्वे नेण्याचा प्रस्ताव आहे.या रेल्वेमार्गाचे घोंगडे दीर्घकाळ भिजत पडले आहे. मुरबाडच्या सरकारी जत्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वेसाठीचा ५० टक्के खर्च राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यांनी फक्त कल्याण-मुरबाड मार्गाचा उल्लेख केला नव्हता, तर मुरबाडमार्गे नगर रेल्वेचा उल्लेख होता. त्यासाठी १००, ५०० किंवा एक हजार कोटी रुपये लागले तरी चालतील. त्याचा निम्मा खर्च राज्य सरकारकडून दिला जाईल, असे स्पष्ट केले होते. त्याविषयी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी ते स्वत: चर्चा करणार होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वे सर्वेक्षणासाठी दोन कोटींची तरतूद केली होती. पण त्यानंतर फक्त सर्वेक्षण झाले. यंदाच्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्राने तरतूद न केल्याने राज्याकडूनही त्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.याबाबत कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी महासंघाचे पदाधिकारी मनोहर शेलार म्हणाले, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग ही केवळ घोषणा ठरु नये. हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नगरपर्यंत नाही, किमान कल्याण-मुरबाडचा मार्ग तरी आश्वासनानुसार पूर्ण व्हायला हवा. पण ते कामही सर्वेक्षणावरच अडले आहे. सध्या कल्याण-नगर रेल्वेमार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याच्या बातम्या नगर जिल्ह्यातून प्रसारित होऊ लागल्याने खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले,कल्याण ते नगर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. येत्या तीन महिन्यात ते सुरू होणे अपेक्षित आहे. सध्या पुणे-नाशिक मार्गाचे सर्वेक्षण झालेले आहे.कल्याण- नगर रेल्वेमार्गासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे दिनेश हुलावळे यांच्याकडे विचारणा केली असता, यापूर्वी दोन-तीन वेळा सर्वेक्षण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचा काही उपयोग झालेला नाही. यातील एका अहवालानुसार कल्याण माळशेजमार्गे नगर रेल्वेमार्ग व्हावा, असा सकारात्मक अहवाल आला आहे. मात्र अशा अहवालांवर पुढे काही होत नाही. त्यामुळे आता सर्वेक्षण झाले किंवा आणखी तीन महिन्यांनी होणार असले, तरी त्यावर काय बोलणार? खरोखर सर्वेक्षण होणार असेल, तर ती चांगली बाब आहे.>काय फिरतोय मेसेज?कल्याण-माळशेजमार्गे नगर या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यावर २६ स्थानके असतील. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कांबा रोड, आपटी, पाटगाव, मुरबाड, राव, दाहेरी मिल्हे, नागातार केबीन, वारीवघर केबीन, देवरुखवाडी, मढ केबीन, जुन्नर रोड, ओतूर, पदरवाडी, मालवाडी, कोठाडेवाडी, शिंदेवाडी, वासुंदे, धोत्रे, भाळवणी आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके त्यावर असतील, असा तपशील दिला जातो आहे. मूळात कल्याण, शहाड, आंबिवली, टिटवाळा, मुरबाड असा मार्ग सध्या प्रस्तावित असताना या मेसेजमध्ये अंबरनाथमार्गे सर्वेक्षण झाल्याचे म्हटले आहे. त्यावर रेल्वेचे अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.‘कथोरे भाजपा सोडा’ : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची बातमी सोशल मीडियावर अपलोड झाली आहे. त्यावर ज्या कमेंट आल्या आहेत, त्यात या मार्गासाठी आग्रह धरणाऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यात- कधी येणार रेल्वे, खोटारडे सरकार, कथोरे भाजपा सोडा, भाजपाशी बांधील राहू नका, कुठे गेली रेल्वे? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.