शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड तालुका तापाने फणफणला; रुग्णांचे हाल, आरोग्य यंत्रणेवर संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 00:56 IST

तालुक्यातील २०७ गावांसह शहरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मुरबाड ग्रामीण रुग्णालयावर आहे.

मुरबाड : कोरोनानंतर मुरबाड तालुका हा सध्या तापाने फणफणला आहे. त्यातच ग्रामीण रुग्णालयातील लॅब गेले तीन महिने बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील २०७ गावांसह शहरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मुरबाड ग्रामीण रुग्णालयावर आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्ण येतात. त्यातील १०० ते १५० रुग्णांना मलेरिया, टायफॉइड याची लागण झाल्याचे निष्पन्न होत असल्याने रक्ताची तपासणी करण्यासाठी डाॅक्टर सल्ला देतात. परंतु ही तपासणी मोफत वा वाजवी दरात ग्रामीण रुग्णालयात होत असली तरी तेथील लॅबमधील तपासणी करणारे मशीन गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त आहे.  

ग्रामीण रुग्णालयाच्या लॅबमधील मशीन हे नादुरुस्त आहे. त्यामुळे येथील रक्ताचे नमुने हे शहापूरमधील लॅबमध्ये पाठविण्यात येत आहेत. मात्र ते तीन दिवसांत न देता त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत मेलवर पाठविण्यात यावेत अशा सूचना देण्यात येत आहेत. - डॉ. गौरी राठोड, उपसंचालिका, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे