शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

मुरबाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:13 IST

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मुरबाड : तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना महसूल खात्याने तालुक्याची आणेवारी जाहीर करून संकटात सापडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर कार्यालयात बसून सरकारी अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस चेतनिसंह पवार यांनी केला असून मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक पाऊस ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यात होत असतो. साधारण १२० ते १३० दिवस हा पाऊस होतो. मात्र, यंदा या जिल्ह्यात पावसाचा नीचांक नोंदवला असून जेमतेम ८० दिवस पाऊस झालेला आहे. जी स्थिती या जिल्ह्यात तीच स्थिती मुरबाड तालुक्यात. भात पीकासाठी कमीतकमी १२० दिवस पावसाची आवश्यकता असताना तालुक्यात ८० दिवस पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असतानाच मुरबाडच्या महसूल विभागाने सप्टेंबर महिन्यांत ८० पैसे नजर आणेवारी जाहीर केली आहे. पाऊसच कमी पडल्याने हळवी पिके साधारण हातात लागली आहेत. तर गरवी, निमगरवी पिके करपली आहेत. भाताच्या लोंब्यांत तांदळाऐवजी पळींज जास्त असल्याने तालुक्यात भाताचे उत्पन्न ५० पैशांपेक्षा कमी आले असताना मुरबाडच्या तहसील कार्यालयाने ८० पैसे आणेवारी दाखवून गोरगरीब शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.>वस्तुस्थितीची पाहणी करातलाठी, मंडळ अधिकारी यांना गावोगावी पाठवून खºया वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन चौधरी यांना दिले.