शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आरोग्याच्या याचिकेवर महापालिकेचे उत्तर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:44 IST

उद्या सुनावणी होण्याची शक्यता; याचिकाकर्त्यांचे लागले लक्ष

- मुरलीधर भवारडोंबिवली : केडीएमसीच्या दोन रुग्णालयांतून व नागरी आरोग्य केंद्रांतून नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महापालिकेकडून म्हणणे मागितले होते. मात्र, महापालिकेच्या वकिलांनी केवळ मुदतवाढ मागवून घेतली असून, म्हणणे मांडलेले नाही. याप्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता असून, त्याकडे याचिकाकर्त्यांचे लक्ष लागले आहे.डोंबिवलीतील राघवेंद्र सेवा संस्थेतर्फे सुनील नायक व महेश साळुंके यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१५ मध्ये ठाकुर्ली येथील मातृछाया इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी, शहरातील रुग्णालये व नागरी आरोग्यसेवा केंद्रांतून नागरिकांना योग्य प्रकारे आरोग्यसेवा मिळावी, ही मागणी या याचिकेद्वारे केली होती. मात्र, २०१५ पासून ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवर ३ सप्टेंबरला आपले म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, सरकारने अद्याप म्हणणे मांडलेले नाही. केडीएमसीच्या वकिलांनी याकरिता मुदत मागितली होती. आठ आठवड्यांची मुदत देऊनही महापालिकेने आपले म्हणणे न्यायालयात मांडलेले नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कोणताच तोडगा महापालिकेने काढलेला नाही. तसेच आरोग्याचा प्रश्न बिकट आहे. महापालिकेचे कल्याण पश्चिमेस रुक्मिणीबाई, पूर्वेत हरकिसनदास, डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय तसेच १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. रुग्णालयाच्या आस्थापनेवर वर्षाला ३० कोटी खर्च केले जातात. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या होत नाही. सिटी स्कॅन, एमआरआय आदींसाठी अन्य खाजगी रुग्णालयांत रुग्णांना पाठवले जाते. रुग्णालयात स्वच्छता नसते.रुक्मिणीबाई रुग्णालयाची इमारत नादुरुस्त आहे. माजी महापौर कल्याणी पाटील यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. सध्या ३९५ डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. आरोग्याविषयी महापालिका हद्दीत इतकी अनास्था व निराशाजनक स्थिती असताना याचिकेवर महापालिकेकडून म्हणणे मांडण्यासाठी सारखा वेळ मागून घेतला जात आहे. आरोग्यासाख्या गंभीर विषयावर महापालिका गांभीर्याने कृती करीत नसल्याचे यातून उघड होत आहे, असे याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले.पुन्हा प्रतीक्षाचरुग्णालयात ११५ मंजूर वैद्यकीय पदांपैकी ४५ पदे भरलेली आहेत. तर, अजून ६५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन हे अन्य सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ४५ हजार रुपयांवरून मानधन ६५ हजारांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला गेला होता. मात्र, सभा तहकूब झाल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. आता पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका