शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याच्या याचिकेवर महापालिकेचे उत्तर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:44 IST

उद्या सुनावणी होण्याची शक्यता; याचिकाकर्त्यांचे लागले लक्ष

- मुरलीधर भवारडोंबिवली : केडीएमसीच्या दोन रुग्णालयांतून व नागरी आरोग्य केंद्रांतून नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महापालिकेकडून म्हणणे मागितले होते. मात्र, महापालिकेच्या वकिलांनी केवळ मुदतवाढ मागवून घेतली असून, म्हणणे मांडलेले नाही. याप्रकरणी सोमवारी पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता असून, त्याकडे याचिकाकर्त्यांचे लक्ष लागले आहे.डोंबिवलीतील राघवेंद्र सेवा संस्थेतर्फे सुनील नायक व महेश साळुंके यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१५ मध्ये ठाकुर्ली येथील मातृछाया इमारत दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी, शहरातील रुग्णालये व नागरी आरोग्यसेवा केंद्रांतून नागरिकांना योग्य प्रकारे आरोग्यसेवा मिळावी, ही मागणी या याचिकेद्वारे केली होती. मात्र, २०१५ पासून ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवर ३ सप्टेंबरला आपले म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, सरकारने अद्याप म्हणणे मांडलेले नाही. केडीएमसीच्या वकिलांनी याकरिता मुदत मागितली होती. आठ आठवड्यांची मुदत देऊनही महापालिकेने आपले म्हणणे न्यायालयात मांडलेले नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे.धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर कोणताच तोडगा महापालिकेने काढलेला नाही. तसेच आरोग्याचा प्रश्न बिकट आहे. महापालिकेचे कल्याण पश्चिमेस रुक्मिणीबाई, पूर्वेत हरकिसनदास, डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय तसेच १३ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. रुग्णालयाच्या आस्थापनेवर वर्षाला ३० कोटी खर्च केले जातात. रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या होत नाही. सिटी स्कॅन, एमआरआय आदींसाठी अन्य खाजगी रुग्णालयांत रुग्णांना पाठवले जाते. रुग्णालयात स्वच्छता नसते.रुक्मिणीबाई रुग्णालयाची इमारत नादुरुस्त आहे. माजी महापौर कल्याणी पाटील यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. सध्या ३९५ डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. आरोग्याविषयी महापालिका हद्दीत इतकी अनास्था व निराशाजनक स्थिती असताना याचिकेवर महापालिकेकडून म्हणणे मांडण्यासाठी सारखा वेळ मागून घेतला जात आहे. आरोग्यासाख्या गंभीर विषयावर महापालिका गांभीर्याने कृती करीत नसल्याचे यातून उघड होत आहे, असे याचिकाकर्त्यांकडून सांगण्यात आले.पुन्हा प्रतीक्षाचरुग्णालयात ११५ मंजूर वैद्यकीय पदांपैकी ४५ पदे भरलेली आहेत. तर, अजून ६५ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन हे अन्य सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ४५ हजार रुपयांवरून मानधन ६५ हजारांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव नुकत्याच पार पडलेल्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला गेला होता. मात्र, सभा तहकूब झाल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. आता पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका