शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पालिका निवडणुकीत लोकसभेची नांदी

By admin | Updated: February 20, 2017 05:49 IST

उल्हासनगर, ठाणे, मुंबई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे

उल्हासनगर : उल्हासनगर, ठाणे, मुंबई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. त्याची नांदी आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक मतदान करून भाजपासह इतर जातीयवादी पक्षांना मतदान करू नये, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.उल्हासनगरच्या कॅम्प-४ येथील सुभाष टेकडी परिसरात सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात शनिवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा झाली. त्यात आंबेडकर यांनी मतदारांना हे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरला असून त्याचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, कारखानदार आणि सर्वसामान्य देशोधडीला लागले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे ते लहान मुलांसारखे भांडत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अगरबत्ती व मेणबत्ती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजत  नाहीत, तर त्यांचे अर्थव्यवस्थेबाबतचे विचार वाचून ते ज्ञान घेतले असते;  तर आजच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था कशी असावी, त्याचे ज्ञान या  लोकांना मिळाले असते, असा  टोला त्यांनी भाजपाला लगावला. लोकांनी भांडवलदारांच्या पक्षांना निवडून दिल्यास ते निवडून आल्यानंतर तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. भारिप बहुजन महासंघ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आमच्या १३ उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. या वेळी भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद मोहन, निरीक्षक दादा डांगळे, सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, युवक अध्यक्ष रितेश गणवीर, महिला अध्यक्ष संगीता नेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)