शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

महापालिका अधिकारी - कर्मचा-यांना समज द्या, वाहतूक पोलिसांनी धाडले महापालिकेस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:37 IST

मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.

धीरज परब मीरारोड - कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात रस्त्यांवर नेहमीसारखी वाहतूक कोंडी नसते. तरी देखील वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने सरकारी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना बंदी आहे. त्यामुळे शहरात एरव्ही होते तशी वाहतूक कोंडी नसते. तसे असले तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा वाहनांवर नियमित कारवाई केली जात आहे. ठाणे ग्रामीण वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी या बाबतचे लेखी पत्रच महापालिकेस दिले आहे. त्यात पवार यांनी म्हटले आहे की, वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतुक पोलीसां कडुन कारवाई दरम्यान महापालिकेचे अनेक कर्मचारी विना हेल्मेट आढळतात. महापालिकेची व ठेक्यावरची लहान - मोठी वाहने चालवताना देखील सीट बेल्ट न बांधणे, सिग्नल तोडणे तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.  त्यांना पोलिसांनी पकडले की ते कर्मचारी, आम्ही पालिकेचे कर्मचारी असून पालिकेचे काम करतो असे सांगतात. तुम्ही आमच्यावर कारवाई करू नका असे सांगून पोलिसांसोबत वाद घालतात. सदर प्रकार सरकारी कर्मचा-यांना शोभणारा नाही. अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेत देखील कारवाईदरम्यान पोलीस पक्षपात करतात, असा संशय होऊन नाराजी वाढते. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात यावी, असे पवार यांनी पालिकेला कळवले आहे.