शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

महापालिका अधिकारी - कर्मचा-यांना समज द्या, वाहतूक पोलिसांनी धाडले महापालिकेस पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:37 IST

मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.

धीरज परब मीरारोड - कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन काळात रस्त्यांवर नेहमीसारखी वाहतूक कोंडी नसते. तरी देखील वाहतूक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना मीरा-भाईंदर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारीच त्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना समज द्या असे खरमरीत पत्रच वाहतूक शाखेने महापालिकेस दिले आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने सरकारी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय अन्य वाहनांना बंदी आहे. त्यामुळे शहरात एरव्ही होते तशी वाहतूक कोंडी नसते. तसे असले तरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने अशा वाहनांवर नियमित कारवाई केली जात आहे. ठाणे ग्रामीण वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी या बाबतचे लेखी पत्रच महापालिकेस दिले आहे. त्यात पवार यांनी म्हटले आहे की, वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहतुक पोलीसां कडुन कारवाई दरम्यान महापालिकेचे अनेक कर्मचारी विना हेल्मेट आढळतात. महापालिकेची व ठेक्यावरची लहान - मोठी वाहने चालवताना देखील सीट बेल्ट न बांधणे, सिग्नल तोडणे तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात.  त्यांना पोलिसांनी पकडले की ते कर्मचारी, आम्ही पालिकेचे कर्मचारी असून पालिकेचे काम करतो असे सांगतात. तुम्ही आमच्यावर कारवाई करू नका असे सांगून पोलिसांसोबत वाद घालतात. सदर प्रकार सरकारी कर्मचा-यांना शोभणारा नाही. अशा प्रकारांमुळे सामान्य जनतेत देखील कारवाईदरम्यान पोलीस पक्षपात करतात, असा संशय होऊन नाराजी वाढते. त्यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांना वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात यावी, असे पवार यांनी पालिकेला कळवले आहे.