शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

पालिका निवडणूक एकत्रितच लढवावी

By admin | Updated: June 23, 2016 03:06 IST

सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे

भार्इंदर : सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप दोन्ही पक्षांनी थांबवून एकत्रित निवडणूक लढवावी, असा सल्ला रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मिरा-भार्इंदर शहर (जिल्हा) अध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह इतर पालिका निवडणुकीत सेना-भाजपाने युती तोडून स्वतंत्र लढल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल. आघाडी सरकारमध्ये एकमेकांवरील कुरघोडींसह त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच नागरिकांनी त्यांना नाकारले. तशी परिस्थिती स्वतंत्रपणे लढल्यास सेना, भाजपाची होऊ नये यासाठी एकत्र लढणे आवश्यक आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत रिपाइचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत त्यांनी दलितांना सत्तेत वाटा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपाच्या विजयासाठी रिपाइने केलेल्या सहकार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केंद्रात मंत्रीपद देणार अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मंत्रिमंडळासह महामंडळात रिपाइला दहा ऐवजी पाच टक्के वाटा मिळावा. केंद्र सरकारबाबत बोलताना त्यांनी युती तुटल्यास भाजपा सरकार अल्पमतात येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेवेळीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय रिपाइसुद्धा भाजपासोबतच राहणार असल्याने सेनेने पाठिंबा काढला तरी फरक पडणार नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीतही सेना, भाजपा युती झाली नाही तर भाजपा, रिपाइ युती नक्की होईल, असा दावा केला. (प्रतिनिधी)