शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणूक एकत्रितच लढवावी

By admin | Updated: June 23, 2016 03:06 IST

सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे

भार्इंदर : सत्ता स्थापनेपासून शिवसेना, भाजपात सुरू असलेली कुरबूर यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उफाळून आली आहे. एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप दोन्ही पक्षांनी थांबवून एकत्रित निवडणूक लढवावी, असा सल्ला रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मिरा-भार्इंदर शहर (जिल्हा) अध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावतीने झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह इतर पालिका निवडणुकीत सेना-भाजपाने युती तोडून स्वतंत्र लढल्यास त्यांच्या विजयाची शक्यता कमी असल्याचे भाकित त्यांनी व्यक्त केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फायदा होईल. आघाडी सरकारमध्ये एकमेकांवरील कुरघोडींसह त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच नागरिकांनी त्यांना नाकारले. तशी परिस्थिती स्वतंत्रपणे लढल्यास सेना, भाजपाची होऊ नये यासाठी एकत्र लढणे आवश्यक आहे. केंद्र व राज्याच्या सत्तेत रिपाइचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत त्यांनी दलितांना सत्तेत वाटा देण्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपाच्या विजयासाठी रिपाइने केलेल्या सहकार्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केंद्रात मंत्रीपद देणार अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील मंत्रिमंडळासह महामंडळात रिपाइला दहा ऐवजी पाच टक्के वाटा मिळावा. केंद्र सरकारबाबत बोलताना त्यांनी युती तुटल्यास भाजपा सरकार अल्पमतात येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तास्थापनेवेळीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय रिपाइसुद्धा भाजपासोबतच राहणार असल्याने सेनेने पाठिंबा काढला तरी फरक पडणार नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीतही सेना, भाजपा युती झाली नाही तर भाजपा, रिपाइ युती नक्की होईल, असा दावा केला. (प्रतिनिधी)