शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनुदानाच्या टेकूवर पालिकेचा डोलारा उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : ढिसाळ कारभार, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याऐवजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : ढिसाळ कारभार, सत्ताधारी व विरोधी पक्षाचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याऐवजी कमी होत असल्याची टीका होत आहे. शहरातील विकासकामे व कामगारांच्या पगारासाठी सरकारच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असून मार्च महिन्याचे अनुदान मिळण्यास उशीर झाल्याने अर्धा महिना उलटूनही कामगारांचा पगार झालेला नाही.

उल्हासनगर महापालिकेचे मालमत्ता कर व सरकारकडून मिळणारे जीएसटी अनुदान हे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. तर मालमत्ता विभाग, नगररचनाकार विभागासह इतर विभागांकडून मिळणारे उत्पन्न अत्यल्प झाले आहे. कोरोना महामारीमुळे मालमत्ता कर वसुली कमी होणार, असा अंदाज आल्याने, महापालिकेला नाईलाजाने मालमत्ता कर व पाणीपट्टी कर विभागासाठी अभय योजना लागू करावी लागली. महापालिका आस्थापनावर दरमहा १९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी १२ कोटी निव्वळ कर्मचाऱ्यांचे पगार, सेवानिवृत्ताच्या वेतनावर खर्च होतो. मालमत्ता कर विभागाकडून वर्षाला १०० कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ७० कोटींची वसुली होते. तर जीएसटीपोटी महापालिकेला सरकारकडून दरमहा १६ कोटी २५ लाखांचे अनुदान मिळते. या अनुदानावर महापालिकेचा कारभार हाकला जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू केल्याने एका महिन्यात २० कोटींची वसुली झाली. मात्र, या निधीतून कामगारांचे पगार देण्याऐवजी कंत्राटदारांची बिले देण्यात आली. दरम्यान, जीएसटीचे अनुदान वेळेत न मिळाल्याने अर्धा महिना उलटूनही कामगारांचे पगार होऊ शकले नाहीत. कामगारनेत्यांनी ठिय्या आंदोलन केल्यावर अखेर वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांचा पगार मुख्य लेखाधिकारी यांना काढावा लागला. एकूणच महापालिका डबघाईला आली असून नवीन उत्पन्नाचे स्त्रोत सुरू करण्यात महापालिका आयुक्त व सत्ताधारी-विरोधकांना यश आलेले नाही. सरकारच्या अध्यादेशानुसार बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली असती तर महापालिकेला ५०० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला असता. मात्र, याबाबत आयुक्तांसह राजकीय नेते पुढाकार घेत नसल्याचे उघड झाले आहे.

चौकट

५०० कोटींचे प्रस्ताव पडून

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना गेल्या महिन्यात महापालिकेचा सर्वसाधारण निधी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृनेते, विरोधी पक्ष, नगरसेवक, प्रभाग समिती, स्थायी समिती सदस्य निधीतून ५०० कोटींपेक्षा जास्त विकासकामांचे प्रस्ताव बांधकाम विभागासह इतर विभागांकडे आले आहेत. या कामांची निविदाप्रक्रिया सुरू असून तेच ते कामे होत असल्याची टीका होत आहे. ही कामे झाल्यावर महापालिका कंत्राटदारांची देणी कशी देणार? असा प्रश्न विचारला जात आहे.