शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

महापालिकेचा रूद्रावतार

By admin | Updated: April 26, 2017 00:22 IST

शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे.

उल्हासनगर : शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे. गळक्या वाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी नाल्यात जात आहे. पालिकेकडे जलवाहिनी दुरूस्तीची अद्ययावत यंत्रणा नसल्याचे उघड झाले. उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांवर एका हंडयासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहराला एमआयडीसी कडून दररोज १२० एमएलडीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असून लोकसंख्या सहा लाख गृहीत धरली आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला रोज १२० लिटर पेक्षा जास्त पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शहराची परिस्थिती वेगळी असून पालिकेला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शहराला आठवडयातून दोन दिवस तेही अपुरे पाणी मिळत आहे. या प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन महासभा पाणीटंचाईवरून गाजत असून हजारो नागरिकांना हातपंपाचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.राष्ट्रीय मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी गृहीत धरले आहे. तर मुंबईसारख्या मोठया शहराला प्रत्येक व्यक्तीमागे ५० ते ६० लिटर दिवसाला पाणी मिळते. याउलट शहराची स्थिती असून पाणीपुरवठा व लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीला २०० लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने शहरातील पाणीवितरण योजना, पाणी गळती, ठप्प पडलेली ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहरातील पाणी वितरणातील दोष कारणीभूत असल्याचे सांगितले. तसेच बेकायदा नळजोडणी व पाणीगळती साठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुख्य जलवाहिनीवर विनापरवाना घेतलेल्या नळजोडणीधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बेकायदा जोडणीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)