शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

महापालिकेचा रूद्रावतार

By admin | Updated: April 26, 2017 00:22 IST

शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे.

उल्हासनगर : शहराला राष्ट्रीय मानांकनापेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई कायम आहे. महापालिका बेकायदा नळजोडण्या व पाणीगळती विरोधात विशेष मोहीम उघडणार आहे. गळक्या वाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी नाल्यात जात आहे. पालिकेकडे जलवाहिनी दुरूस्तीची अद्ययावत यंत्रणा नसल्याचे उघड झाले. उल्हासनगरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांवर एका हंडयासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहराला एमआयडीसी कडून दररोज १२० एमएलडीपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत असून लोकसंख्या सहा लाख गृहीत धरली आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला रोज १२० लिटर पेक्षा जास्त पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात शहराची परिस्थिती वेगळी असून पालिकेला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त शहराला आठवडयातून दोन दिवस तेही अपुरे पाणी मिळत आहे. या प्रकाराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन महासभा पाणीटंचाईवरून गाजत असून हजारो नागरिकांना हातपंपाचे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.राष्ट्रीय मानांकनानुसार प्रत्येक व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी गृहीत धरले आहे. तर मुंबईसारख्या मोठया शहराला प्रत्येक व्यक्तीमागे ५० ते ६० लिटर दिवसाला पाणी मिळते. याउलट शहराची स्थिती असून पाणीपुरवठा व लोकसंख्येनुसार प्रत्येक व्यक्तीला २०० लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने शहरातील पाणीवितरण योजना, पाणी गळती, ठप्प पडलेली ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना आदींवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहरातील पाणी वितरणातील दोष कारणीभूत असल्याचे सांगितले. तसेच बेकायदा नळजोडणी व पाणीगळती साठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच मुख्य जलवाहिनीवर विनापरवाना घेतलेल्या नळजोडणीधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बेकायदा जोडणीकरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)