शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

महापालिकेचे डम्पिंगबाबत लेखी उत्तर, उल्हासनगराला २०२५ पर्यंत डम्पिंगचा फास 

By सदानंद नाईक | Updated: July 13, 2024 16:00 IST

म्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले.

उल्हासनगर : डम्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. या उत्तराने डम्पिंगचा फास नागरिकांच्या भोवती दीड वर्ष राहणार असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, येथील खडी खदान डम्पिंग ग्राऊंड परिसरातील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा टाहो फोडत डम्पिंग हटावची मागणी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी करून, नेताजी चौकात आमरण उपोषण केले होते. शहरातील डम्पिंग केंव्हा हटविणार? कुठे स्थलांतरित करणार? आज त्या जागेची काय स्थिती? असे प्रश्न विचारले होते. महापालिकेचे सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांनी उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर यांचा वालवली गाव हद्दीत ८ एकर जागेत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा राहत असल्याचे सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२५ नंतर पूर्ण झाल्यावर त्याजागी शहरातील डम्पिंग स्थलांतरित करणार असल्याचे लेखी उत्तर उपोषणकर्ते काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांना दिल्यावर साळवे यांनी उपोषण मागे घेतले.

 महापालिकेच्या लेखी उत्तराने शहरातील खडी खदान येथील डम्पिंग सन-२०२५ नंतर हटणार असल्याचे उघड झाले. त्यामुळे कमीतकमी दीड वर्ष खडी खदान परिसरातील २० हजार पेक्षा जास्त नागरिकांना डम्पिंगचा त्रास सहन करावा लागणार आहे. डम्पिंगला हिवाळा व उन्हाळ्यात आग लागत असल्याने, परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी यापूर्वी डम्पिंग हटावसाठी रस्ता रोखो, धरणे आंदोलन, उपोषण, महापालिकेत ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेच्या उत्तराने डम्पिंगचा फास दीड वर्ष कायम राहणार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करून दीड वर्ष मरणयातना सहन करायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर