शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

मीरारोड : केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेकडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा ...

मीरारोड : केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेकडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

शहरी विकास मंत्रालय भारत सरकारमार्फत १९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू करण्यात आले आहे. मलनिस्सारण वाहिनी, सेप्टिक टँक व मॅनहोलमध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करून घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. जीवितहानी टाळण्यासाठी मलनिस्सारण वाहिनी, सेप्टिक टँक व मॅनहोलमध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाच्या साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर भर असणार आहे.

सफाईमित्रांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याकरिता शुक्रवारी ३० जुलै रोजी मीरारोडच्या जीसीसी क्लब येथे सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संभाजी पानपट्टे, सहायक आयुक्त सचिन बच्छाव, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे, किरण राठोड व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, शहरी विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत पाणी पुरवठा विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सफाईमित्र उद्यमीकरण आणि उन्नतीकरण प्रोत्साहन योजना, सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रॅम, सफाईमित्र चित्रकला सप्ताह आदी उपक्रम राबवले. सफाईमित्रांना युनिफॉर्म, सुरक्षा किट आणि प्रमाणपत्र त्यासोबतच स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला.

शहरी विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार या कार्यक्रमामध्ये लोन मेळावादेखील आयोजिला होता. त्यात महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते. पाणी पुरवठा विभागद्वारा सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजअंतर्गत राबविल्या गेलेल्या विविध संकल्पनांचा लेखाजोखा अप-रायझिंग : आपला मित्र, सफाईमित्र या पुस्तकाचे प्रकाशन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे जनजागृतीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊन युवकांचा या अभियानामध्ये सक्रिय सहभाग करून घेतला जात आहे. लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थिती असतानादेखील पाणी पुरवठा विभागाद्वारे ‘सफाईमित्र ऑनलाइन टॉक सिरीज’ सुरू करण्यात आली.

केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा च`लेंज अभियानअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत सेप्टिक टँक, मलनिस्सारण वाहिनी, मॅनहोल संबंधित तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४२० आणि व्हॉटसॲप क्रमांक ८६५७९०६८८० सुरू करण्यात आलेले आहे. नागरिकांनी तक्रार नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त ढोले यांनी केले आहे.