शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रहिवाशांचा पालिकेला आता ४८ तासांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:29 IST

कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न बजावता पालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे

ठाणे : कोणतीही पूर्वसूचना न देता, नोटीस न बजावता पालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. याबाबत, वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही पालिका दखल घेत नसल्याने अखेर घोडबंदर, पाचपाखाडी, कळवा, सुभाषनगर, डॉ. आंबेडकर रोड येथील रहिवाशांनी आता पालिकेला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. या कालावधीत आमचे पुनर्वसन त्याच ठिकाणी करण्याची हमी दिली नाही, तर समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी सोमवारी दिला.महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागांत रस्ता रुंदीकरण सुरू आहे. परंतु, आनंदनगर भागात रुंदीकरणात नसलेली घरेदेखील तोडल्याचा आरोप या समितीने केला. डॉ. आंबेडकर रोड भागातील तलावाला नवसंजीवनी देण्याच्या नावाखाली येथील रहिवाशांना बेघर करण्याचे कारस्थान सुरू आहे. वास्तविक पाहता, हे रहिवासी तलावाच्या बाजूला राहत असून पालिकेचे प्रभाग समिती कार्यालयही हे त्यावर उभे असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. त्यामुळे केवळ विकासकांच्या फायद्यासाठीच हे धोरण अवलंबले जात असल्याचे मत समितीचे मुख्य समन्वयक किशोर दिवेकर यांनी केले.पातलीपाडा येथील शासकीय जमिनीच्या घरावरील निकाल हा रहिवाशांच्या बाजूने लागला आहे. त्यानुसार, उशिरा का होईना जिल्हाधिकारी कार्यालयाला जाग आली आहे. परंतु, पालिकेकडून ९५ पूर्वीचा दाखला मात्र दिला जात नाही. त्यांच्याकडून ही अडवणूक कशासाठी, असा सवालही त्यांनी केला आहे. सुभाषनगर भागात एसआरए योजना राबवण्याचे सांगून मागील कित्येक वर्षांपासून येथील शेकडो रहिवाशांना बेघर केले आहे. परंतु, या योजनेचा विकासक असलेल्या शिवसेना नगरसेवकाकडून मात्र अद्यापही येथील रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. शहराच्या इतर भागातही हीच परिस्थिती असून रहिवाशांच्या घरांवर हातोडा टाकला जात आहे.