शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ...

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल होण्याची विनंती केली आहे. परंतु, घरी योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही, अशी विविध कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एक लाख २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ५२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एक हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयू आणि ८१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून, उर्वरित नंतरचे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेदेखील ते बंद केले आहे. परंतु, असे असले तरी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, अशी विनंती महापालिका त्यांना करीत आहे. परंतु, ते जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे सांगत आहेत. घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरूम वेगळा आहे, तसेच घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे, अशी कारणे ते देत आहेत. यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधादेखील आहे. परंतु, अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याचे हाल ते होतीलच, शिवाय तेथे दिवस काढणेदेखील कठीण होणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन त्यांच्याही मनात भीती निर्माण होणार आहे, अशीही कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.