शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ...

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल होण्याची विनंती केली आहे. परंतु, घरी योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही, अशी विविध कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एक लाख २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ५२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एक हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयू आणि ८१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून, उर्वरित नंतरचे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेदेखील ते बंद केले आहे. परंतु, असे असले तरी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, अशी विनंती महापालिका त्यांना करीत आहे. परंतु, ते जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे सांगत आहेत. घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरूम वेगळा आहे, तसेच घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे, अशी कारणे ते देत आहेत. यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधादेखील आहे. परंतु, अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याचे हाल ते होतीलच, शिवाय तेथे दिवस काढणेदेखील कठीण होणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन त्यांच्याही मनात भीती निर्माण होणार आहे, अशीही कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.