शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गृहविलगीकरणातील रुग्णांनी वाढविली महापालिकेची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ...

ठाणे : राज्य शासनाने १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याने ठाणे महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात दाखल होण्याची विनंती केली आहे. परंतु, घरी योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आहेत, काम थांबेल, इंटरनेटची सुविधा मिळणार नाही. घरचे जेवण मिळणार नाही, अशी विविध कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत एक लाख २८ हजार कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ५२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर एक हजार ९१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५३७ रुग्णांवर प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत. त्यातील ५८२ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर ७०७ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. २४८ रुग्ण गंभीर असून, १६७ आयसीयू आणि ८१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आजही ५४९ रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील ५० टक्के रुग्ण हे राज्य शासनाचा आदेश होण्यापूर्वीचे असून, उर्वरित नंतरचे आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद केल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेदेखील ते बंद केले आहे. परंतु, असे असले तरी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या अलगीकरण केंद्रात उपचारासाठी दाखल व्हावे, अशी विनंती महापालिका त्यांना करीत आहे. परंतु, ते जाण्यास तयार नाहीत, आम्ही घरीच बरे होऊ असे सांगत आहेत. घरात असलो तरी आमची खोली वेगळी आहे, वॉशरूम वेगळा आहे, तसेच घरी जे हवे ते वेळेत खाण्यासही मिळत आहे, अशी कारणे ते देत आहेत. यापुढेही जाऊन कोरोना झाला असला तरी लक्षणे नसल्याने घरी बसून काम करता येत आहे, कामाचे खाडे होत नाहीत, कामामुळे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार मनात येत नाही. काम करण्यासाठी इंटरनेट आणि लॅपटॉपची सुविधादेखील आहे. परंतु, अलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर खाण्यापिण्याचे हाल ते होतीलच, शिवाय तेथे दिवस काढणेदेखील कठीण होणार आहे. तसेच कपड्यांची बॅग घेऊन पुन्हा घरच्यांपासून वेगळे होऊन त्यांच्याही मनात भीती निर्माण होणार आहे, अशीही कारणे देऊन ते अलगीकरण केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल होत नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.