शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

पालिका आयुक्त मोकाट; तर खड्डे सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:11 IST

मुंबईसह राज्यातील २६ महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यावर खड्डे पडले व नागरिकांनी त्याबद्दल तक्रार केल्यावर, दोन आठवड्यांत ते न बुजविल्यास संबंधित आयुक्तांना जबाबदार धरून, त्यांच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.

- नारायण जाधवठाणे : मुंबईसह राज्यातील २६ महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यावर खड्डे पडले व नागरिकांनी त्याबद्दल तक्रार केल्यावर, दोन आठवड्यांत ते न बुजविल्यास संबंधित आयुक्तांना जबाबदार धरून, त्यांच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. यंदा मुंबई महानगर प्रदेशात पाच-सहा जणांचा खड्ड्यांमुळे बळी जाऊनही ‘आयुक्त मोकाट तर खड्डे सुसाट’ असेच चित्र आहे.मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये महापालिकांच्या क्षेत्रातील खड्ड्यांमुुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन, राज्य शासन, महापालिकांचे चांगलेच कान टोचले होते. न्यायालयाने जुलै २०१५ मध्ये खास आदेश देऊन मुंबईसह राज्यातील २६ पालिका (पनवेल महापालिका तेव्हा नव्हती) क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविली. तरीही खड्डे यंदाही तसेच आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व महापालिकांनी खड्ड्यांबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्याकरिता टोल फ्री नंबरसह वेबसाइट प्रसिद्ध करण्याची, तसेच मोबाइलवरील टेक्स्ट मेसेज अथवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश स्वीकारून आलेल्या तक्रारींचे निराकरण झाल्याचे, संबंधित तक्रारदारास दोन आठवड्यांच्या आत छायाचित्रासह कळवायचे आहे. याबाबत, नगरविकास खात्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व महापालिकांना नवीन नियमावलीची सक्ती केली होती. मात्र, आज या नियमावलीस तीन वर्षे उलटली, तरी तिचे पालन न करता सर्वांनीच न्यायालयाचा अवमान केल्याचे दिसत आहे.- न्यायालयाच्या निर्देशानुसार जुलै २०१५ मध्ये नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थाना दिलेल्या आदेशांनुसार, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या अधिकार क्षेत्रातील रस्ते, पदपथ, पाण्याचा निचरा होण्याचे पाथ होल सुस्थितीत ठेवायचे आहेत, तसेच विविध संस्था, कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी देताना ते पुन्हा पूर्ववत करण्याच्या अट घातली आहे. संबंधित प्राधिकरणे, खासगी कंपनीने काम करताना आवश्यक फलक लावावेत. यात काम करणाºया कंपनीचे नाव, कामाचा अंदाजे कालावधी, कामाची व्याप्ती देण्याचे बंधन घातले आहे.रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरावे. नागरिकांच्या तक्रारींचे छायाचित्रणाच्या आधारे निराकरण करून, अंतिम कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह वेबसाइट आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करावी, असे बजावले होते. या संपूर्ण प्रक्रियेत आयुक्तांना जबाबदार धरण्यात येणार असून, त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.आजही अनेक महापालिकांच्या वेबसाइट अद्ययावत नाहीत. प्रत्येक महापालिकानिहाय व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक त्या ठिकाणच्या कोणत्याच नागरिकाला ठाऊक नाही. मग ते तक्रार करणार तरी कुठे हा प्रश्न आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार या सूचनांप्रमाणे तत्काळ कार्यवाही करून व केलेल्या कामांचा अनुपालन अहवाल तत्काळ शासनास सादर करून, न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे बजावण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणे