शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

By admin | Updated: May 12, 2017 01:48 IST

फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता समिती स्थापन करून फेरीवाल्यांना राजकीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय यामुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे. महापालिकेने रस्ता रुंदीकरण केल्यावर त्या जागेवर फेरीवाल्यांनी बिनदिक्कत कब्जा करीत व्यापाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवल्या आहेत. गावदेवी भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल जाण्यास गेल्या दोनअडीच वर्षांतील घटना कारणीभूत आहेत. आयुक्तपदी संजीव जयस्वाल आल्यावर त्यांनी गेल्या दीड वर्षात ठाण्यातील २०० ते २५० दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यामुळे रस्ते मोकळे झाले. ठाणेकरांनी या कारवाईचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, अल्पावधीत हे मोठे झालेले रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले. यामुळे नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्वच्छतेचा कर देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला. व्यापाऱ्यांना इंगा दाखवण्याकरिता प्रशासनाने त्यांच्या दुकानापुढे कचरा आणून टाकल्याने वाद चिघळला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यामध्ये उडी घेऊन समेट घडवून आणला. मात्र, फेरीवाल्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने व्यापारी व काही राजकीय नेते अस्वस्थ होते. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अलीकडेच फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. कुणीही आव्हानात्मक भाषा केल्यावर त्याला चोख उत्तर देण्याकरिता ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांच्या वतीने संदीप माळवी हे बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी असताना सायंकाळी कारवाईला बाहेर पडले. या वेळी त्यांचा फेरीवाले व नागरिक यांच्याशी वाद झाला. त्याचे पर्यवसान माळवी यांना मारहाणीत झाले. आता फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जयस्वाल यांनी केला आहे. मात्र, फेरीवाल्यांची समस्या चिघळण्यास पालिका प्रशासनाचे वेळकाढू धोरणही कारणीभूत आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांत करणे अपेक्षित असतानाही आज सुमारे चार वर्षे उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. याच काळात फेरीवाल्यांमध्ये चौपट वाढ झाली. त्यातच, आता नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा शासनाचा नवीन आदेश आहे. परंतु, या निवडणुका कुणी, कशा घ्यायच्या, याचा काहीच उल्लेख नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आठवडाबाजाराच्या नावाखाली फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. पालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हेदेखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार ठाण्यात सुमारे १० हजारांच्या आसपास फेरीवाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काहींच्या मते प्रत्यक्षात फेरीवाल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असून ती दिवसागणिक वाढत आहे. स्टेशन परिसरात व अन्यत्र पालिकेच्या वतीने सतत कारवाई होत असतानादेखील फेरीवाल्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. याला जबाबदार ठाणेकर नागरिक आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यावर ते याच बेकायदा फेरीवाल्यांकडून साहित्यखरेदी करत असल्याने फेरीवाल्यांचे फावते.