शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

By admin | Updated: May 12, 2017 01:48 IST

फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता समिती स्थापन करून फेरीवाल्यांना राजकीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय यामुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे. महापालिकेने रस्ता रुंदीकरण केल्यावर त्या जागेवर फेरीवाल्यांनी बिनदिक्कत कब्जा करीत व्यापाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवल्या आहेत. गावदेवी भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल जाण्यास गेल्या दोनअडीच वर्षांतील घटना कारणीभूत आहेत. आयुक्तपदी संजीव जयस्वाल आल्यावर त्यांनी गेल्या दीड वर्षात ठाण्यातील २०० ते २५० दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यामुळे रस्ते मोकळे झाले. ठाणेकरांनी या कारवाईचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, अल्पावधीत हे मोठे झालेले रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले. यामुळे नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्वच्छतेचा कर देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला. व्यापाऱ्यांना इंगा दाखवण्याकरिता प्रशासनाने त्यांच्या दुकानापुढे कचरा आणून टाकल्याने वाद चिघळला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यामध्ये उडी घेऊन समेट घडवून आणला. मात्र, फेरीवाल्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने व्यापारी व काही राजकीय नेते अस्वस्थ होते. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अलीकडेच फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. कुणीही आव्हानात्मक भाषा केल्यावर त्याला चोख उत्तर देण्याकरिता ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांच्या वतीने संदीप माळवी हे बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी असताना सायंकाळी कारवाईला बाहेर पडले. या वेळी त्यांचा फेरीवाले व नागरिक यांच्याशी वाद झाला. त्याचे पर्यवसान माळवी यांना मारहाणीत झाले. आता फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जयस्वाल यांनी केला आहे. मात्र, फेरीवाल्यांची समस्या चिघळण्यास पालिका प्रशासनाचे वेळकाढू धोरणही कारणीभूत आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांत करणे अपेक्षित असतानाही आज सुमारे चार वर्षे उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. याच काळात फेरीवाल्यांमध्ये चौपट वाढ झाली. त्यातच, आता नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा शासनाचा नवीन आदेश आहे. परंतु, या निवडणुका कुणी, कशा घ्यायच्या, याचा काहीच उल्लेख नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आठवडाबाजाराच्या नावाखाली फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. पालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हेदेखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार ठाण्यात सुमारे १० हजारांच्या आसपास फेरीवाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काहींच्या मते प्रत्यक्षात फेरीवाल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असून ती दिवसागणिक वाढत आहे. स्टेशन परिसरात व अन्यत्र पालिकेच्या वतीने सतत कारवाई होत असतानादेखील फेरीवाल्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. याला जबाबदार ठाणेकर नागरिक आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यावर ते याच बेकायदा फेरीवाल्यांकडून साहित्यखरेदी करत असल्याने फेरीवाल्यांचे फावते.