शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्य्राचा बेशिस्तीचा कलंक कधी पुसला जाणार?, लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:52 IST

मुंब्रा- डोंगरमाथ्यावर असलेल्या मुंब्रादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुंब्रा शहर खºया अर्थाने खाडीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे.

- पंकज रोडेकर, कुमार बडदे,मुंब्रा- डोंगरमाथ्यावर असलेल्या मुंब्रादेवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मुंब्रा शहर खºया अर्थाने खाडीकिनारी आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. सुमारे आठ ते नऊ लाखांच्या घरात लोकसंख्या पोहोचली आहे. बहुसंख्य मुस्लिम आणि कमी प्रमाणात असलेली हिंदूंची लोकवस्ती. तरीसुद्धा, ही मंडळी कित्येक वर्षे गुण्यागोविंदाने मुंब्य्रात वास्तव्यास आहे.नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा या शहरालाही आहेत. एका बाजूला शांततेत जीवन जगणारे दोन्ही जातींचे नागरिक, तर दहशतवादी कारवायांमधील काही आरोपी हे मुंब्रा परिसरात पकडले गेल्याने मुंब्रा बदनाम झाले. गुन्हेगारीचा कलंकच लागला. म्हणजे, एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यावर समजायचे की, ही व्यक्ती आपल्या शेजारी राहायची. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकीकरणामुळे तेथील मूलभूत सुविधाही तोकड्या पडू लागल्या आहेत. त्यातच, स्थानिक लोकप्रतिनिधीही छोट्याछोट्या गोष्टींसाठी राजकारण करतात. याचा फटका सामान्यांना बसतो. दुसरीकडे या सुविधा देण्यात महापालिका प्रशासनाकडूनही काही प्रमाणात दुर्लक्षच झाले आहे.मुंब्रा म्हटले की, वारंवार प्रखरतेने दिसणारी अस्वच्छता असो, दुर्गंधी असो, वाहतूककोंडी असो, फेरीवाल्यांचा प्रश्न असो, वीजबिल (देयक) असो, इतर नागरी सुविधा असो... या वाढत नसल्या तरी त्या कमी होतानाही दिसत नसल्याने मुंब्रा म्हणजे बेशिस्त, असा शिक्का या शहरावर बसला आहे. ठाणे महापालिकेचा इतिहास पाहिल्यास मुंब्य्राला एक वेळ महापौरपदाची संधी चालून आली होती. त्यानंतरद्व बºयाच वेळा विरोधी पक्षनेतेपद, सभागृहनेतेपदही मुंब्रा शहराच्या वाट्याला आले. परंतु, त्यांच्या माध्यमातून जो काही विकास झाला, तो आता इतिहासजमा झाला, असेच म्हणावे लागेल. कारण, आज शहराची परिस्थिती पाहता विकास कुठे झालेला दिसत नाही. जरी शहरात सुविधांचा अभाव असला, तरी नागरिकीकरण होत आहे. नागरिकही येथे राहण्यासाठी येत आहेत. यामुळे महापालिकेवर मुंब्य्रातून सध्या २३ नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ नगरसेवक आहेत. सत्ताधाºयांचा एकही नगरसेवक नसल्याने येथे विकासाची गंगा आणण्यासाठी विरोधकांना दोन हात करण्याशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर बेशिस्त छाप पुसण्यासाठी प्रशासन वेळोवेळी जनजागृती मोहीम राबवते. परंतु, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. मागील काही वर्षांपासून मुंब्रा शहर वेगवेगळ्या वास्तूंमुळे आपली नवी ओळख निर्माण करत आहे.यासाठी मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या आवारातच शहीद स्मारक करण्यात आले असून तेथे रणगाडा, एम वास्तू तर कौसा भागातील अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडिअमयांची भर पडली आहे. शहीद स्मारक आणि एम आकारात उभारलेल्या वास्तूला सध्या बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.>सुविधांची वानवा दूर होणार तरी कधी?ठाणे महापालिकेत असूनही सत्ताधाºयांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मुब्रा कायमच बकाल होत गेले. देशभर ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला जात असला तरी तो या शहरात पालिकेने पोचू दिलेला नाही. अपुरे पाणी, सतत होणारा विजेचा खेळखंडोबा, आरोग्य-शिक्षणाच्या सुविधांची वानवा यामुळे मुंब्रावासीयांचा सतत कोंडमारा होतो. तो दूर करणार कधी हा प्रश्न आहे.मुंब्य्रात ज्या काही सुविधा मिळतात, त्या महापालिकेच्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या सुविधांपासून मुंब्य्रावर नेहमीच अन्याय झाला आहे. स्थानिक आमदार महापालिकेच्या माध्यमातून होणाºया कामांवर श्रेय लाटत आहेत. मुंब्य्रात अस्वच्छता आहे. पाणी मुबलक असले तरी, त्याच्या वितरणावर नियंत्रण नाही. एकाच केंद्रावर मुंब्य्रातील आरोग्यव्यवस्था अवलंबून आहे.त्यातच, आणखी पालिकेच्या माध्यमातून रुग्णालय होणार आहे. मात्र, त्याच्या खासगीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याने गरिबांना त्याचा उपयोग होणार नाही. मराठी शाळांची अवस्था बिकट असून तेथे बसण्यापासून स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. बायपास हा रस्ता तर ‘मौत का कुआ’ झाला आहे. अमृतनगर हे कोंडीचे ठिकाण आहे. तसेच मुंब्य्रातून नवीन पर्याय मार्ग होत आहे. त्यामुळे मुंब्य्रात आणखी कोंडी होईल, अशी भीती आहे. - सुधीर भगत, माजी नगरसेवक>प्रथम दर्शन होते अस्वच्छतेचेरेल्वेस्थानकातून मुंब्रा शहरात बाहेर पडल्यावर प्रथम दर्शन होते ते अस्वच्छतेचे. या दोन्ही वास्तूंना गर्दुल्ले आणि भिकाºयांनी वेढले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा होणारा कानाडोळा याला कारणीभूत आहे.

टॅग्स :mumbraमुंब्राterroristदहशतवादी