शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मुंबईप्रमाणे ठाण्यात रस्तासुरक्षेचा प्रचार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:09 IST

ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उच्चशिक्षित ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...

पंकज रोडेकर मुंबईत, बोरिवलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर मिळालेल्या पदोन्नतीद्वारे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रुजू झालेल्या उच्चशिक्षित ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद...

शिस्तप्रिय आणि कडक अधिकारी म्हणून आपण ओळखले जाता?होय मला, चुकीचे काम अजिबात आवडत नाही आणि सहनही होत नाही. मी जेव्हा बोरिवली येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रमुख) होतो, त्यावेळी रिक्षा तसेच दलालासंदर्भात आणि नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात पोलीस ठाण्यात एकूण ७५ एफआयआर दाखल केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणी अटकेची कारवाई झाल्यानंतर दाखल फौजदारी गुन्ह्याबद्दल न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाली आहेत.

आपल्या नावावर चार महिन्यांच्या अंतराने दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहेत.बोरिवलीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रस्तासुरक्षा सप्ताह राबवताना, पहिल्यांदाच मुंबईत जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. ती गोरेगाव, एसआरपीएफ ते बांद्रे अशी होती. तीत एकूण ११ हजार मोटारसायकली सहभागी झाल्याने त्याची गिनीज बुकने नोंद घेतली होती. त्यानंतर, चार महिन्यांतच देशाचा हॅण्डबॉल फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून हॅण्डबॉल लीग यशस्वी केली, त्यावेळीही बेस्ट हॅण्डबॉल म्हणून त्याचीही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

आपण राज्यघटनेचे अभ्यासक आहात.मुळात शिक्षणाची आवड आणि गोडी असल्याने जगातील ७५ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास पूर्ण केला आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना, त्याच्यावरही एक मसुदा लिहिण्याचे धाडस केले आहे.

रणजीसाठी महाराष्ट्र संघात निवड झाल्यानंतरही आपण, शिक्षणाला पसंती दिली.मी, बारावीला असताना, राज्यात प्रथम आलो होतो. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना, माझी रणजी क्रिकेटसाठी महाराष्टÑ संघात निवड झाली होती. त्यावेळी शिक्षणाच्या गोडीमुळे मैदान सोडून शिक्षणाला पहिली पसंती दिली. इंजिनीअरिंगला असताना, दोन सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर, एक वर्ष टाटा संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर शासकीय सेवेकडे वळलो.

नागरिकांना काय आवाहन कराल ?युवकांनी आदर्श नागरिक व्हावे, चांगले शिक्षण आणि निर्व्यसनी राहून रस्तासुरक्षेच्या नियमावलींचे पालन करावे, तसेच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रहितासाठी कार्य करावे. त्याचबरोबर वाहनांसंदर्भात काही अडचणी येत असतील, तर थेट आपल्याशी संपर्क साधावा.

ठाण्यात नवनवीन उपक्रम राबवून नागरिकांसाठी एक आदर्श कार्यालय बनवून मुंबईप्रमाणे रस्तासुरक्षेचा प्रचार करायचा आहे. - रवी गायकवाड, आरटीओ, ठाणे

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी