शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

By अनिकेत घमंडी | Updated: June 12, 2025 08:12 IST

Mumbai Suburban Railway: मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

-अनिकेत घमंडीडोंबिवली - ठाणे जिल्ह्यात नवीन ठाणे, चिखलोली, मानस मंदिर, दातीवली, पारसिक यांसह मुंबई उपनगरात ३२ नवी स्थानके प्रस्तावित आहेत. यांची उभारणी केली, तर सध्याच्या स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचे विभाजन होईल व लोकलमध्ये प्रवेश करण्यासाठी जीवघेणी गर्दी होणार नाही. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित स्थानकांची कामे मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

चिखलोली स्थानक सात वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्याला निधी मिळून बांधकामही सुरू आहे. नवीन ठाणे स्थानकाचे तेच रडगाणे आहे. दिवा-कोपर मार्गावर दातीवली, बदलापूरजवळ समर्थवाडी स्थानकाचा प्रस्ताव तसाच आहे. आसनगावजवळ मानस मंदिराचा विषयही तसाच. जिल्ह्यात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने कल्याणच्या पुढे वांगणी, शेलू, नेरळपर्यंत आणि टिटवाळा, खडवली, आसनगाव, वासिंद परिसरात नागरिक घरांना पसंती देत आहेत. त्यामुळे तेथे नव्याने रेल्वेस्थानक होणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गुरवलीच्या मागणीचे ५० वर्षे भिजत घोंगडे आहे.

फेऱ्या वाढवागर्दीच्या विभाजनासाठी लोकल फेऱ्या वाढवणे त्यासोबतच नव्याने रेल्वे स्थानकांची निर्मिती गरजेची आहे. चिखलोली स्थानक झाल्यास अंबरनाथ स्थानकाचा भार कमी होईल, मानस मंदिर झाल्यास आसनगाव, वासिंद आणि दातीवली झाल्यास दिव्याचा भार कमी होईल.

नवे ठाणे स्थानक झाल्यावर सध्याच्या ठाणे स्थानकातील होणारी गर्दी कमी होईल. तेथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्यास ठाणे स्थानकाला मोकळा श्वास घेता येईल. प्रस्तावित पारसिक स्टेशन झाल्यास मुंब्रा, कळवा स्थानकातील गर्दीचे विभाजन होईल; परंतु नव्या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत. 

दातीवली स्थानकाची मागणी १९८० पासून, तर  गुरवलीची मागणी १९६५ पासून प्रलंबित आहे. बदलापूर-वांगणी मार्गावर समर्थवाडी स्थानक प्रस्तावित आहे. प्रवाशांची मागणी असल्याने रेल्वेने सर्व्हे करावे व त्यांना मंजुरी द्यावी.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष,ठाणे रेल्वे प्रवासी संस्था.

अंबरनाथजवळ असलेल्या चिखलोली स्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. हे स्थानक झाल्यास बदलापूर, अंबरनाथ स्थानकांतील गर्दीवर निश्चित परिणाम होईल. प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन झाले, तरच सध्याच्या स्थानकात आणखी सुविधा देण्याकडेही लक्ष देता येईल. नव्याने स्थानके होणे गरजेचे आहे. - अनुप मेहेत्रे,  दक्ष प्रवासी, अंबरनाथ 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbai Localमुंबई लोकल