शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

रस्त्यावरील खड्डयांमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर पुन्हा अडथळ्यांची शर्यत; पोलिसांसह यंत्रणांची तारांबळ

By जितेंद्र कालेकर | Updated: September 13, 2022 21:59 IST

सकाळी ८ ते दुपारी १२ अशी चार तास अडथळयांच्या शर्यतीचा हा सामना चालकांना करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे शहरातील कोपरी ब्रिजसह साकेत ब्रिजवरील खड्डयांमुळे मुंबई नाशिक मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र मंगळवारी ठाणेकरांना अनुभवायला मिळाले. मुख्य मार्गावर पडलेल्या खडय़ांमुळे शहराच्या विविध भागात तसेच इतर ठिकाणी देखील वाहतुक कोंडीचा ताप वाहन चालकांना सहन करावा लागल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. सकाळी ८ ते दुपारी १२ अशी चार तास अडथळयांच्या शर्यतीचा हा सामना चालकांना करावा लागला.

ठाणेकरांना आता खडय़ांमुळे नित्याचीच वाहुतक कोंडी झालेली आहे. त्यात साकेत मार्गावर पुन्हा खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यात भर म्हणून मुंबई नाशिक मार्गावर दोन ठिकाणी ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा थेट तीन हात नाक्यापर्यंत लागल्या होत्या. त्यातही या मार्गावर पडलेल्या खडय़ांचा ताप नाहक वाहन चालकांना सहन करावा लागत होता. पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित यंत्रणांची तातडीने मदत घेतली. त्यामुळे माजिवडा आणि कोपरी भागात हे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वारंवार खड्डे पडल्याचे चित्र आहे. आधी काही प्रमाणात बुजविले खड्डयांमुळे रस्ता रुळावर येत असतांनाच सोमवारी झालेल्या पावसांमुळे पुन्हा या खड्डयांमध्ये भर पडली. अनेक खड्डयांमध्ये पाणी भरल्यामुळे वाहतूकीचा वेगही मंदावला होता. ठाणे वाहतुक पोलिसांच्या वतीने एमएसआरडीसी, बांधकाम विभाग तसेच इतर प्राधिकरणांना पत्रव्यवहार केला आहे. परंतू, वारंवार होणाऱ्या खड्डयांंमुळे नागरिकांसह पोलिसांनाही याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कॅडबरी जंक्शन, कशेळी-काल्हेर, कोपरी पूल आणि शिळफाटा भागात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूकीचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी १ नंतर ही वाहतूक काही प्रमाणात पूर्वपदावर आली. या वाहतूक कोंडीमुळे अवघे पाच मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना २५ ते ३० मिनिटांचा अवधी लागत होता.अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचता आले नाही.

कुठे पडली खड्डयांची भर

सोमवारी रात्रभर झालेला पाऊस. त्यात साकेत ब्रिजवर आणि कोपरी पूलावर तसेच खारेगाव ते साकेत या मार्गावर मोठया प्रमाणात खड्डे वाढले होते. त्यात अवजड वाहनांची वाहतूक ही पहाटे ५ ऐवजी उशिरापर्यंत सुरु राहिल्यामुळे या कोंडीमध्ये आणखीनच भर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणे