शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

नव्या पुलाला मुहूर्त

By admin | Updated: October 10, 2016 03:22 IST

पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर

उल्हासनगर : पावसाळ्यात पडलेल्या वडवली पुलावर साधारण ३० लाखांचा खर्च येणार आहे. एकूण पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने याच्या दुरुस्तीवर खर्च न करता नवीन पूल बांधला जाईल. दिवाळीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली. यासाठी सव्वादोन कोटी खर्च येणार असून वर्षभरात पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, येथील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पर्यायी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.मागील महिन्यात हा पूल कोसळल्याने येथील गावांचा संपर्क तुटला. नागरिक जीव मुठीत घेऊन या तुटलेल्या पुलावरून ये-जा करत आहेत. शालेय विद्यार्थीही येथून जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वालधुनी नदीपलीकडे वडवली गाव आहे. गावाला जाण्यासाठी अंबरनाथहून मोठा, तर उल्हासनगरहून लहान पूल आहे. ३० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल धोकादायक झाल्यामुळे नवीन पुलाची मागणी माजी नगरसेविका सुमन शेळके व उपमहापौर पंचशीला पवार यांनी पालिकेकडे वारंवार केली होती. दोन वर्षांपूर्वी नवीन पुलाची निविदा काढली होती. मात्र, कंत्राटदारच मिळाला नाही. ज्या कंत्राटदाराला पुलाचे काम मिळाले, त्याने अद्यापही काम सुरू केले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नवीन पुलाच्या उभारणीला एका वर्षापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याने पर्यायी पादचारी पूल किंवा अर्धवट कोसळलेल्या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पवार यांनी पालिकेकडे लावून धरली. गेल्या महासभेत पुलाच्या दुरुस्तीबाबत पीठासीन अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दुरुस्तीचे आदेश दिले. वडवली पुलाच्या दुरुस्तीबाबतचा अहवाल पालिकेने नाखवा कंपनीकडे मागितला होता. कंपनीच्या पथकाने पुलाचे निरीक्षण केल्यावर दुरुस्ती सूचवून ३० लाखांचा प्रस्ताव सादर केला.