शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांवरून रंगली चिखलफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 03:26 IST

असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे शहरात जुलैमध्ये पाच जणांचे बळी गेल्यानंतरही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आलेली नसल्याची जोरदार टीका सोशल मीडियावर नागरिक करत आहेत.

मुरलीधर भवार

कल्याण : असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे शहरात जुलैमध्ये पाच जणांचे बळी गेल्यानंतरही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आलेली नसल्याची जोरदार टीका सोशल मीडियावर नागरिक करत आहेत. खड्ड्यांचे फोटो टाकून त्यांनी प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढले आहे. ‘मिशन जन कल्याण’ आंदोलनांतर्गत रस्त्यांवरील खड्डे मोजा आणि तितकेच फटके अधिकारी व कंत्राटदाराला मारा. परंतु, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत, असे आवाहन जागरूक नागरिक व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक नारायण पाटील यांनी केले आहे. त्याचबरोबर, आकाशातून हजारो वर्षांपूर्वी उल्कापात झाला. त्यापैकी काही उल्का कल्याणमधील रस्त्यावर पडल्या. त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले. हे एक उत्कृष्ट विज्ञान प्रदर्शन होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांची वैज्ञानिक सहल काढून उल्कापाताचे विश्लेषण करता येऊ शकते, असे अन्य एकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डोंबिवलीचे भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी बचत ही संकल्पना घेतली आहे. त्यात वीज, पाणी, पैसे, इंधन याच्या बचतीवर त्यांनी भर दिला आहे. परंतु, या संकल्पावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सडकून टीका केली आहे. खड्डे बुजवले गेलेले नाहीत. त्यात पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामुळे पाण्याची बचत होत आहे. खड्ड्यांमुळे वेळ, इंधन जास्त वाया जाते. मग बचत कशी होणार, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला आहे. नागरिकांना खड्डेमय रस्ते दिल्याने डांबर व खडीची बचत केली जात आहे, हाच खरा प्रचार व प्रसार होऊ शकतो, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकव व्हॉटस्अ‍ॅपवर टाकली आहे.खड्ड्यांची संख्या भ्रष्टाचाराचे प्रमाण सिद्ध करते. हे नवे अंकगणित आहे, अशी पोस्ट मनोज वैद्य यांनी फेसबुकवर टाकली आहे. तर, निवडणुकीत दारू, पैसे घेऊन मटणाच्या पार्ट्या झोडल्यावर मतदारांना खड्ड्यातील पाण्यात पडावे लागते, अशी पोस्ट विनायक पाटील यांनी टाकली आहे.

माहिती अधिकारातील कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी वर्षभरापूर्वी शेकडो खड्ड्यांचे सर्वेक्षण केले होते. प्रत्येक खड्ड्याला नंबर देत त्याचे फोटे काढले. ही माहिती प्रशासनाकडे सादर केली होती. त्यानंतर रस्त्याचे काम झालेले नसतानाही ते झाल्याची बाब उघडकीस आणली होती. त्यात एक कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी दाखवून दिले. ही माहिती फेसबुकवर पोस्ट केली. पंरतु, प्रशासनाला संबंधितांविरोधात कारवाई करण्यात स्वारस्य नसल्याचे यातून दिसून येत आहे.डेडलाइन की केवळ राजकीय स्टंटबाजी?च्केडीएमसीने साडेचार हजार खड्डे बुजवल्याचा दावा महिनाभरापूर्वी केला होता. मात्र, तरीही खड्ड्यांविषयी नागरिकांच्या पोस्ट पाहता महापालिकेने नेमके कोणते व कुठले खड्डे बुजविले, असा सवाल उपस्थित होतो.च्खड्डे बुजविण्यासाठी १३ कोटी रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने तातडीने मंजुरी दिली. मग खरोखरच कामे सुरू झाली का?, असा प्रश्न आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीनंतर काय झाले?च्पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर, मनसे, भारिप बहुजन महासंघ, काँग्रेसने आंदोलन केले. प्रशासनाला दिलेल्या डेडलाइन हे पक्ष विसरले की, ही त्यांची राजकीय स्टंटबाजी होती? जेणे करून एखाद्या समस्येवर राजकीय पोळीभाजून त्यातून प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि चर्चेत यायचे, हा उद्देश होता का?, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे