शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

भार्इंदरमधून पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी संकलनाचा श्री गणेशा

By admin | Updated: March 5, 2017 18:43 IST

देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने

ऑनलाइन लोकमत/ राजू काळे भार्इंदर, दि. 5 - देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने श्रमजीवी संघटनेने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा श्री गणेशा भार्इंदर येथील संघटनेच्या कार्यालयातून संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या हस्ते करण्यात आला.

जगातील कुपोषित बालकांच्या यादीत भारत अव्वल ठरत आहे. त्याचे प्रमाण २० कोटी इतके असून राज्यातील प्रमाण ३७ हजार ५०० इतके आहे. राज्यातील एकट्या पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून ते आजमितीस ७ हजार ८५३ इतके आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ८०० कुपोषित बालकांचा पोषक आहाराअभावी मृत्यु झाला आहे. देशातील शहरी तसेच ग्रामीण भागात राहणारे ९१ टक्के आदिवासी दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. त्यातील बहुतांशी बालके व माता कुपोषित आहेत. त्यांना पुरेसा व सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडुन अनुसूचित क्षेत्रातील बालकांच्या विकासासाठी ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी आॅगस्ट २०१५ मध्ये बंद करण्यात आला. यामुळे पुरेशा निधीअभावी बालकांना पोषण पुर्नवसन केंद्रांतर्गत आवश्यक आहार मिळेनासा झाला आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत पुरेसे काम ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाही.

रोजगाराअभावी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. परिणामी बालकांचे कुपोषण होत आहे. ज्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार मिळतो, अशा लाभार्थ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल अंतर पायी चालावे लागते. यात वेळ वाया जात असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे पुरेशा रोजगाराला लोकं मुकतात. अशा ग्रामीण तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाय््राा कुटुंबातील बालके योग्य, सकस आहार व अदयावत उपचारापासुन वंचित रहात आहेत. यासाठी राज्य सरकारने बंद केलेला निधी आदिवासी विकास योजनेंतर्गत उपलब्ध करुन द्यावा, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातुन सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. परंतु, त्याची दखल अद्याप सरकारकडुन घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हार येथे गेल्या अनेक महिन्यांपासुन उपचार छावणी सुरु करण्यात आली आहे. त्यातील उपचारासाठी निधीची कमतरता भासत असल्याने ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातुन निधी संकलित करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आल्याचे विवेक पंडीत यांनी सांगितले.