शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
6
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
7
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
8
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
9
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
10
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
11
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
12
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
13
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
14
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
15
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
16
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
17
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
18
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
19
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
20
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी

भार्इंदरमधून पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी संकलनाचा श्री गणेशा

By admin | Updated: March 5, 2017 18:43 IST

देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने

ऑनलाइन लोकमत/ राजू काळे भार्इंदर, दि. 5 - देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने श्रमजीवी संघटनेने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा श्री गणेशा भार्इंदर येथील संघटनेच्या कार्यालयातून संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या हस्ते करण्यात आला.

जगातील कुपोषित बालकांच्या यादीत भारत अव्वल ठरत आहे. त्याचे प्रमाण २० कोटी इतके असून राज्यातील प्रमाण ३७ हजार ५०० इतके आहे. राज्यातील एकट्या पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून ते आजमितीस ७ हजार ८५३ इतके आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ८०० कुपोषित बालकांचा पोषक आहाराअभावी मृत्यु झाला आहे. देशातील शहरी तसेच ग्रामीण भागात राहणारे ९१ टक्के आदिवासी दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. त्यातील बहुतांशी बालके व माता कुपोषित आहेत. त्यांना पुरेसा व सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडुन अनुसूचित क्षेत्रातील बालकांच्या विकासासाठी ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी आॅगस्ट २०१५ मध्ये बंद करण्यात आला. यामुळे पुरेशा निधीअभावी बालकांना पोषण पुर्नवसन केंद्रांतर्गत आवश्यक आहार मिळेनासा झाला आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत पुरेसे काम ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाही.

रोजगाराअभावी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. परिणामी बालकांचे कुपोषण होत आहे. ज्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार मिळतो, अशा लाभार्थ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल अंतर पायी चालावे लागते. यात वेळ वाया जात असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे पुरेशा रोजगाराला लोकं मुकतात. अशा ग्रामीण तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाय््राा कुटुंबातील बालके योग्य, सकस आहार व अदयावत उपचारापासुन वंचित रहात आहेत. यासाठी राज्य सरकारने बंद केलेला निधी आदिवासी विकास योजनेंतर्गत उपलब्ध करुन द्यावा, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातुन सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. परंतु, त्याची दखल अद्याप सरकारकडुन घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हार येथे गेल्या अनेक महिन्यांपासुन उपचार छावणी सुरु करण्यात आली आहे. त्यातील उपचारासाठी निधीची कमतरता भासत असल्याने ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातुन निधी संकलित करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आल्याचे विवेक पंडीत यांनी सांगितले.