शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरमधून पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी संकलनाचा श्री गणेशा

By admin | Updated: March 5, 2017 18:43 IST

देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने

ऑनलाइन लोकमत/ राजू काळे भार्इंदर, दि. 5 - देशातील कुपोषित बालकांपैकी सर्वाधिक कुपोषित बालके एकट्या पालघर जिल्ह्यात आहेत. अशा बालकांच्या उपचारासाठी सरकारी निधीची कमतरता भासत असल्याने श्रमजीवी संघटनेने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचा श्री गणेशा भार्इंदर येथील संघटनेच्या कार्यालयातून संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या हस्ते करण्यात आला.

जगातील कुपोषित बालकांच्या यादीत भारत अव्वल ठरत आहे. त्याचे प्रमाण २० कोटी इतके असून राज्यातील प्रमाण ३७ हजार ५०० इतके आहे. राज्यातील एकट्या पालघर जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण सर्वाधिक असून ते आजमितीस ७ हजार ८५३ इतके आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ८०० कुपोषित बालकांचा पोषक आहाराअभावी मृत्यु झाला आहे. देशातील शहरी तसेच ग्रामीण भागात राहणारे ९१ टक्के आदिवासी दारिद्रय रेषेखालील जीवन जगतात. त्यातील बहुतांशी बालके व माता कुपोषित आहेत. त्यांना पुरेसा व सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडुन अनुसूचित क्षेत्रातील बालकांच्या विकासासाठी ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी आॅगस्ट २०१५ मध्ये बंद करण्यात आला. यामुळे पुरेशा निधीअभावी बालकांना पोषण पुर्नवसन केंद्रांतर्गत आवश्यक आहार मिळेनासा झाला आहे. त्यातच रोजगार हमी योजनेंतर्गत पुरेसे काम ग्रामीण भागातील लोकांना मिळत नाही.

रोजगाराअभावी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. परिणामी बालकांचे कुपोषण होत आहे. ज्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगार मिळतो, अशा लाभार्थ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल अंतर पायी चालावे लागते. यात वेळ वाया जात असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. यामुळे पुरेशा रोजगाराला लोकं मुकतात. अशा ग्रामीण तसेच दुर्गम भागात वास्तव्य करणाय््राा कुटुंबातील बालके योग्य, सकस आहार व अदयावत उपचारापासुन वंचित रहात आहेत. यासाठी राज्य सरकारने बंद केलेला निधी आदिवासी विकास योजनेंतर्गत उपलब्ध करुन द्यावा, यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातुन सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु आहे. परंतु, त्याची दखल अद्याप सरकारकडुन घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जव्हार येथे गेल्या अनेक महिन्यांपासुन उपचार छावणी सुरु करण्यात आली आहे. त्यातील उपचारासाठी निधीची कमतरता भासत असल्याने ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातुन निधी संकलित करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आल्याचे विवेक पंडीत यांनी सांगितले.