शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

वाढवणप्रकरणी खासदारांची गोची

By admin | Updated: June 25, 2016 01:25 IST

वाढवण बंदर रद्द करण्यासंदर्भातले वाढवण बंदर संघर्ष समितीचे निवेदन मी वाचले असून त्याचा नीट अभ्यासही केला आहे.

पालघर : वाढवण बंदर रद्द करण्यासंदर्भातले वाढवण बंदर संघर्ष समितीचे निवेदन मी वाचले असून त्याचा नीट अभ्यासही केला आहे. परंतु या बंदरामुळे कुठलेही भूसंपादन होणार नसून उलट या बंदर प्रकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार असल्याचे उत्तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांना दिले आहे. त्यामुळे खासदारांची पुरती गोची झाली असून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळण्यासाठी बंदराला विरोध करतात की भाजपा सरकारच्या निर्णयापुढे हतबल ठरतात, याकडे किनारपट्टीचे लक्ष लागून राहिले आहे.या बंदरामुळे मच्छीमार, बागायतदार, डायमेकर, आदिवासी, दलितांनी केलेले आंदोलन, सेनाप्रमुखाचा विरोध तसेच पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या आदेशाने तात्कालीन युती सरकारला वाढवण बंदर रद्द करावे लागले होते. यामुळे किनारपट्टीवरील हजारो लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. आम्हाला आमच्या जीवनात कोणताही हस्तक्षेप नको, असे सांगून बंदराला सर्व स्तरावरून विरोध असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)विद्यमान युतीच्या केंद्र आणि राज्य सरकारने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टबरोबर करार केला असून हे काम पूर्वी पी अँड ओ कंपनी करणार होती. ते आता जे एन पी टी ४.५ नॉटिकल मैल खोल समुद्रात करणार आहे. सदरची जागा मच्छीमारी बंदरापासून ही वेगळी असल्याने त्याचा व्यवसायावर कुठलाही परिणाम होणार नसून कोणतेही गाव विस्थापित केले जाणार नाही. फक्त बंदराला जोडणारे रस्ते थेट महामार्गाशी जोडणे एवढेच भूसंपादन केले जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदार वनगा यांच्या तक्रारी अर्जाला उत्तर देताना कळविले आहे. तर मग बंदर उभारल्यानंतर बंदरातून १३२ मिलियन टन क्षमता असणाऱ्या या बंदरातून इतक्या मालाचे आवागमन फक्त रस्त्याद्वारे होणे शक्य नसल्याने रेल्वे सेवेचे जाळेही पसरविण्यात येणार आहे. परंतु एम ओ यूमध्ये म्हटल्याप्रमाणे चौपदरी रस्ता आणि रेल्वे उभारणीसाठी जमिनी खरेदी करावी लागणार असल्याने केंद्रीय मंत्री जनतेची दिशाभूल करीत असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण घोषित करण्यात आले असतानाही वाढवण बंदराचा प्रादेशिक आराखडयात समावेश करण्यात आल्याचे खासदार वनगा यांनी कळविल्यानंतर पर्यावरणाची शास्त्रीय पाहणी करून समस्यांचे निराकरण केले जाईल असे गडकरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.शासनाने सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून वाढवन बंदर उभारणे बेकायदेशीर ठरणार असल्याचा आक्षेप ही घेण्यात आला असताना तसेच हा भाग नैसिर्गक दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे मासे विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे बंदर अस्तित्वात आल्यास मोठमोठ्या परदेशी बोटीची वर्दळ वाढून जहाजावरील तेल, इंधन विरघळून समुद्री पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, डहाणू मासेमारी बंदर आणि तारापूर बंदर या मधील आवश्यक अंतरावर वाढवन बंदर उभारण्यात येणार आहे. तसेच जहाज आणि बंदर सुरक्षिततेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंधने कटाक्षाने पाळली जातील, असे उत्तर गडकरी यांनी खा.वनगा यांना कळविले आहे.