शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबई - अहमदाबाद महामार्गाला जलसमाधी देणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी खासदारांची प्रशासनाला १५ दिवसांची मुदत

By धीरज परब | Updated: July 2, 2023 00:34 IST

पोलीस आयुक्तांनी भरणी माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत

मीरारोड - वरसावे खाडी पूलच्या वसई दिशेकडील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या काही दिवसां पासून सलग पाण्याखाली जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे . ह्या भागात भरणी माफियांनी घातलेला धुमाकूळ व भरणी करून झालेली बेकायदा बांधकामे राष्ट्रीय महामार्गाच्या जलसमाधीला कारणीभूत असताना प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली बद्दल खासदार राजेंद्र गावित यांनी पोलीस आयुक्तांच्या बैठकीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली . १५ दिवसात भरणी माफिया आणि बेकायदा बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई करून महामार्गावरील पाणी साचण्याची समस्या सोडवा अन्यथा संसदेत आवाज उठवू असा इशारा गावित यांनी दिला आहे . तर पोलीस आयुक्तांनी भरणी माफियांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत . 

वसईच्या हद्दीतील ससुनवघर भागातला महामार्ग हा पहिल्याच पावसात पाण्यात गेला आहे . गेले काही दिवस पाणी साचून असल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहुनी चार चार तास अडकून पडत आहेत . गेल्या काही वर्षां पासून हि समस्या उद्भवली असताना संबंधित प्रशासन सातत्याने सांगून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप खा . गावित यांनी व्यक्त केला . त्यांच्या मागणी वरून शुक्रवारी सायंकाळी मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मीरारोड येथील आयुक्तालयात बैठक झाली . 

यावेळी  पोलीस आयुक्त मधुकर पांडे, वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले,  परिमंडळ २ व ३ चे पोलीस उपायुक्त , वसईचे प्रांताधिकारी शेखर घाडगे, तहसीलदार अविनाश कोष्टी , महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पाऊस सुरु झाल्या पासून महामार्गावरील ससूनवघर,किनारा धाबा, नालासोपारा फाटा, विरार फाटा येथे गुडघ्या इतके पाणी साचून १८ पेक्षा जास्त वाहने बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत . महामार्ग पाण्यात बुडाल्याने वाहने व त्यातील प्रवाशी अडकून पडले व वाहनांच्या पाच किलोमीटर अंतरा इतक्या रांगा लागल्या होत्या असे सांगत महामार्ग प्राधिकरणाच्या चिटणीस यांच्यावर खा . गावित संतप्त झाले . महामार्ग प्राधिकरणाने पाणी जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत , खड्डे बुजवले नाहीत त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी तंबी चिटणीस यांना दिली .  

घोडबंदर,  चिंचोटी, मनोर, कासा, तलासरी येथील महामार्गावर प्रत्येकी एक अशा पाच  रुग्णवाहिका ठेवा , ४० टन वजन उचलण्याची क्षमता असलेले क्रेन, अग्निशमनची गाडी ठेवण्यास चिटणीस यांना सांगितले . तर वसई महापालिका व महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले . 

खासदारांच्या तंबी नंतर शनिवारी प्रशासनाने मोठ्या भरावातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोदण्यास सुरवात केली आहे . तर येथील बेकायदा भरणी बंद करून झालेली भरणी व बेकायदा बांधकामे काढण्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई प्रशासन करणार का ? या कडे लक्ष लागले आहे . 

राष्ट्रीय महामार्गाला जलसमाधी कशी व कोणा मुळे ?  ससुनवघर येथे एका बाजूला वसईची खाडी आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय वन उद्यानच्या डोंगर रांगा आहेत . पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाणी हे पूर्वी नैसर्गिक ओढ्यातून परिसरातील कांदळवन , पाणथळ , सीआरझेड क्षेत्र मध्ये साचून नंतर खाडीत जायचे . परंतु गेल्या काही वर्षात काही स्थानिक भरणी माफिया व जमीन मालकांनी संगनमत करून ह्या क्षेत्रात असलेले मोठ्या प्रमाणातील कांदळवन , पाणथळ , सीआरझेड क्षेत्र , इको सेन्सेटिव्ह क्षेत्र नष्ट करून प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव चालवले आहेत . 

मोठ्या प्रमाणात भराव होऊन कच्ची - पक्की असंख्य बेकायदा व्यावसायिक बांधकामे बांधली गेली आहेत . त्यात नैसर्गिक ओढे व खाडीची आत येणारी पात्रे नष्ट केली वा अरुंद केली आहेत . त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने महामार्ग पाण्यात बुडतो . देशाचा महत्वाचा असलेला राष्ट्रीय महामार्ग पाण्यात बुडत असल्याची कारणे माहित असून देखील महसूल , वन , महापालिका , पोलीस , महामार्ग प्राधिकरण विभाग सह स्थानिक राजकारणी यांनी अर्थपूर्ण कानाडोळा चालवला . त्यामुळेच गेल्या काही वर्षात येथील परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे .