शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डहाणूत नीरेपासून गूळनिर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:33 IST

खादी व ग्रामोद्योग विभागाचा उपक्रम, नागरिकांना प्रशिक्षण, महात्मा गांधींचा होता आशीर्वाद

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : तालुक्यातील आगर येथील गजानन नाईक बहुउद्योगीय प्रशिक्षण संस्था, केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योग आयोगाकडून चालविली जाते. येथे स्वातंत्र्यापूर्वीपासून नीरा संकलन व विक्र ी केली जाते. मात्र नुकतेच दोनशे स्थानिकांना प्रशिक्षण देऊन निरेपासून गूळनिर्मिती करून त्याची विक्री करण्यात आली. त्यामुळे या उद्योगाचा विकास करण्याचे धोरण या संस्थेने ठरविले असल्याने ताडगुळाची बाजारपेठ असा ठसा उमटविण्यास हे शहर सज्ज झाले आहे.ताडगूळ उद्योगाअंतर्गत ग्रामीण नागरिकांना निरेपासून गूळनिर्मितीचे प्रशिक्षण देण्याकरिता क्षेत्रभेटी, जनजागृती अन्य संवाद पद्धतीचा प्रभावी वापर करून अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ताडी व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश अधिक असल्याने शंभर जोडप्यांची (पति-पत्नी) निवड केली. त्यांना २९ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत निरेपासून गुळ बनविण्याचे प्रशिक्षण सी. एस. सूर्यवंशी, विजय कडू, एल. एम. वरखंडे यांनी प्राचार्य विकास लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले. स्थानिक ताडी व्यावसायिकांना नीरा काढण्यास प्रवृत्त करून गूळ निर्मितीच्या व्यवसायात समावेश करून घ्यायचा हा त्यामागचा उद्देश प्राचार्यांनी बोलून दाखवला. २०० प्रशिक्षणार्थ्यांना आठ गटात विभागून प्रत्येक गटाला १० लीटर नीरा देण्यात आला. गॅस अथवा लाकडाच्या वापराने भट्टी पेटवून कढईतील द्रावणाला दीड ते दोन तास उकळवल्यावर तयार झालेले घट्ट द्रावण लाकडाच्या साच्यात ओतल्यावर ३०० ग्रॅम वजनाच्या गुळाच्या वड्या बनल्या त्या १ किलो झाल्या. डहाणूत स्वातंत्र्यापूर्वी गजानन नाईक यांनी नीरा उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. सध्या खादी ग्रामोद्योगाकडून नीरा संकलन व विक्री केली जाते. निरेपासून गूळनिर्मिती व विक्र ीला भरघोस प्रतिसाद लाभल्याने प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून स्थानिक ताडी व्यावसायिक व नागरिकांचा या व्यवसायाकडे वळतील.-विकास लाडे, प्राचार्य, गजानन नाईक बहुउद्योगीय प्रशिक्षण केंद्र,खादी ग्रामोद्याग आयोग आगरप्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना मिळणार केंद्राकडून कर्जस्थानिक बाजारा प्रमाणेच मुंबई आणि अन्य शहरात त्याला मोठी मागणी असून आॅनलाईन ग्राहक सर्वाधिक असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले. या व्यवसायाकरिता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना पंतप्रधान ग्रामीण रोजगार योजनेतून कर्ज पुरवठयाची सोय आहे. शिवाय त्यांना कढई, एलपीजी बर्नर, साचे (दोन नग) आदी साहित्य विनामूल्य दिले आहे. त्यांनी उत्पादित केलेला सर्व गूळ स्वीकारण्याची हमी या संस्थेकडून देण्यात आली आहे. शिवाय स्वत: ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याचीही मुभा आहे.