शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

म्हशींना हलवा; मगच बंदोबस्त मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:57 IST

कल्याण भिंत दुर्घटना प्रकरण : बाजारपेठ पोलिसांचे आयुक्तांना पत्र

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना बेकायदा बांधकामांमुळे घडली होती. या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तेथे असलेल्या म्हशींना आधी सुरक्षित ठिकाणी हलवा, मगच पुरेसा बंदोबस्त दिला जाईल, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे कारवाईस पोलीस बंदोबस्ताअभावी ब्रेक लागला आहे. पोलिसांच्या या अजब पत्रामुळे म्हशींना महापालिका कशी हलविणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.

उर्दू शाळेची भिंत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. यावेळी उर्दू शाळेच्या व्यवस्थापनाने बेकायदा बांधकामामुळे भिंत कोसळल्याचे म्हटले होते. महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात वेळीच कारवाई केली गेली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे म्हटले होते. ज्या भागात भिंत कोसळली, तेथून महापालिकेचा १२ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर या रस्त्याच्या काम हाती घेतले जाईल. त्याला गती दिली जाईल असे आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्ट केले. त्यानुसार महापालिकेने हालचाली सुरू केल्या. रस्तेविकासाच्या आड येणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी ‘क’ प्रभागाचे अधिकारी भरत पवार यांनी बाजारपेठ पोलिसांकडे पोलीस बंदोबस्त मागविला होता. पोलीस बंदोबस्त मिळताच मंगळवारी बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई हाती घेतली जाणार होती. ही कारवाई सुरू करण्यास पोलीस बंदोबस्त देता येणार नाही, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

कारवाईस पोलीस बंदोबस्त देता येणार नाही. जेथे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला आहे, तेथे सात ते आठ गोठे आहेत. त्यामध्ये ७०० म्हशी आहेत. या गोठ्यांविरोधात कारवाई केल्यास तेथील म्हशी उघड्यावर ठेवाव्या लागतील. सध्या पावसाचा जोर असून पावसामुळे म्हशींच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने म्हशींची पर्यायी व्यवस्था केल्यास कारवाईसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाईल. बंदोबस्तच न मिळाल्याने अखेर ही कारवाई टळली आहे.

...तर प्रस्तावित रस्ता अडखळणारम्हशींची सुरक्षितता करणे हे महापालिकेचे काम नाही. तरी देखील पोलिसांनी आयुक्तांना हा उपदेशाचा डोस पाजला आहे. पोलिसांच्या या उत्तराने महापालिकेचे प्रशासनच चक्रावून गेले आहे. पोलिस बंदोबस्तच मिळणार नसेल तर प्रस्तावित रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणे कठीण असल्याचे यातून उघड होत आहे.