शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

म्हशींना हलवा; मगच बंदोबस्त मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:57 IST

कल्याण भिंत दुर्घटना प्रकरण : बाजारपेठ पोलिसांचे आयुक्तांना पत्र

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना बेकायदा बांधकामांमुळे घडली होती. या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तेथे असलेल्या म्हशींना आधी सुरक्षित ठिकाणी हलवा, मगच पुरेसा बंदोबस्त दिला जाईल, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे कारवाईस पोलीस बंदोबस्ताअभावी ब्रेक लागला आहे. पोलिसांच्या या अजब पत्रामुळे म्हशींना महापालिका कशी हलविणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.

उर्दू शाळेची भिंत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. यावेळी उर्दू शाळेच्या व्यवस्थापनाने बेकायदा बांधकामामुळे भिंत कोसळल्याचे म्हटले होते. महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात वेळीच कारवाई केली गेली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे म्हटले होते. ज्या भागात भिंत कोसळली, तेथून महापालिकेचा १२ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर या रस्त्याच्या काम हाती घेतले जाईल. त्याला गती दिली जाईल असे आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्ट केले. त्यानुसार महापालिकेने हालचाली सुरू केल्या. रस्तेविकासाच्या आड येणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी ‘क’ प्रभागाचे अधिकारी भरत पवार यांनी बाजारपेठ पोलिसांकडे पोलीस बंदोबस्त मागविला होता. पोलीस बंदोबस्त मिळताच मंगळवारी बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई हाती घेतली जाणार होती. ही कारवाई सुरू करण्यास पोलीस बंदोबस्त देता येणार नाही, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

कारवाईस पोलीस बंदोबस्त देता येणार नाही. जेथे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला आहे, तेथे सात ते आठ गोठे आहेत. त्यामध्ये ७०० म्हशी आहेत. या गोठ्यांविरोधात कारवाई केल्यास तेथील म्हशी उघड्यावर ठेवाव्या लागतील. सध्या पावसाचा जोर असून पावसामुळे म्हशींच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने म्हशींची पर्यायी व्यवस्था केल्यास कारवाईसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाईल. बंदोबस्तच न मिळाल्याने अखेर ही कारवाई टळली आहे.

...तर प्रस्तावित रस्ता अडखळणारम्हशींची सुरक्षितता करणे हे महापालिकेचे काम नाही. तरी देखील पोलिसांनी आयुक्तांना हा उपदेशाचा डोस पाजला आहे. पोलिसांच्या या उत्तराने महापालिकेचे प्रशासनच चक्रावून गेले आहे. पोलिस बंदोबस्तच मिळणार नसेल तर प्रस्तावित रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणे कठीण असल्याचे यातून उघड होत आहे.