शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

म्हशींना हलवा; मगच बंदोबस्त मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:57 IST

कल्याण भिंत दुर्घटना प्रकरण : बाजारपेठ पोलिसांचे आयुक्तांना पत्र

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील उर्दू शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना बेकायदा बांधकामांमुळे घडली होती. या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तेथे असलेल्या म्हशींना आधी सुरक्षित ठिकाणी हलवा, मगच पुरेसा बंदोबस्त दिला जाईल, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे कारवाईस पोलीस बंदोबस्ताअभावी ब्रेक लागला आहे. पोलिसांच्या या अजब पत्रामुळे म्हशींना महापालिका कशी हलविणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.

उर्दू शाळेची भिंत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. यावेळी उर्दू शाळेच्या व्यवस्थापनाने बेकायदा बांधकामामुळे भिंत कोसळल्याचे म्हटले होते. महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात वेळीच कारवाई केली गेली असती तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे म्हटले होते. ज्या भागात भिंत कोसळली, तेथून महापालिकेचा १२ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर या रस्त्याच्या काम हाती घेतले जाईल. त्याला गती दिली जाईल असे आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्ट केले. त्यानुसार महापालिकेने हालचाली सुरू केल्या. रस्तेविकासाच्या आड येणारी बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यासाठी ‘क’ प्रभागाचे अधिकारी भरत पवार यांनी बाजारपेठ पोलिसांकडे पोलीस बंदोबस्त मागविला होता. पोलीस बंदोबस्त मिळताच मंगळवारी बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई हाती घेतली जाणार होती. ही कारवाई सुरू करण्यास पोलीस बंदोबस्त देता येणार नाही, असे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

कारवाईस पोलीस बंदोबस्त देता येणार नाही. जेथे कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागितला आहे, तेथे सात ते आठ गोठे आहेत. त्यामध्ये ७०० म्हशी आहेत. या गोठ्यांविरोधात कारवाई केल्यास तेथील म्हशी उघड्यावर ठेवाव्या लागतील. सध्या पावसाचा जोर असून पावसामुळे म्हशींच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने म्हशींची पर्यायी व्यवस्था केल्यास कारवाईसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाईल. बंदोबस्तच न मिळाल्याने अखेर ही कारवाई टळली आहे.

...तर प्रस्तावित रस्ता अडखळणारम्हशींची सुरक्षितता करणे हे महापालिकेचे काम नाही. तरी देखील पोलिसांनी आयुक्तांना हा उपदेशाचा डोस पाजला आहे. पोलिसांच्या या उत्तराने महापालिकेचे प्रशासनच चक्रावून गेले आहे. पोलिस बंदोबस्तच मिळणार नसेल तर प्रस्तावित रस्त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होणे कठीण असल्याचे यातून उघड होत आहे.