शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बानामल चांदवानी यांच्यावर कोसळला दु.खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST

उल्हासनगर : साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या चांदवानी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध वडील ...

उल्हासनगर : साईशक्ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या चांदवानी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध वडील मंदिराचे सेवाधारी असल्याने व मृत दीपकची पत्नी बाहेर गेल्याने वाचली. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत चौघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बानामल चांदवानी हे पत्नी मोहिनी, विवाहित मुलगा दीपक, दिनेश, दीपक यांचा १७ वर्षाचा मुलगा पुनीत असे चौघे एकत्र राहत होते. तर दीपकची पत्नी दुसरीकडे राहण्यास गेली आहे. बानामल सतनाम साक्षी मंदिराचे सेवाधारी असल्याने शुक्रवारी मंदिरात गेले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मोहिनी, मुलगा दीपक, दिनेश व नातू पुनीत असे चौघेजण हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी पाचव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने चौघांचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला. इमारतीचा स्लॅब कोसळून कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती बानामल यांना मिळाल्यावर त्यांना मानसिक धक्का बसला. आमदार कुमार आयलानी यांच्यासह पोलीस, अग्निशमन, नातेवाईक आदी त्यांना धीर देत होते.

धोकादायक इमारतीच्या यादीत साईशक्तीचे नाव नव्हते असे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन, त्यांच्यावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चांदवानी बंधू लहान-मोठा व्यवसाय करीत होते. तर बानामल सतनाम साकी मंदिराचे सेवाधारी आहेत.

------------------------------------आयलानी यांचा आंदोलनाचा इशारा

शहरातील धोकादायक व जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणी बाबत राज्य सरकार वेळीच तोडगा काढत नसल्याने, आणखी किती जणांचे बळी घेणार? असे पत्र आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. नुसते आश्वासन न देता, यातून ठोस तोडगा काढल्यास इमारत दुर्घटनेत बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले. नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.