शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मोखाडा तहानलेलाच

By admin | Updated: February 17, 2016 01:44 IST

तालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील

रवींद्र साळवे,  मोखाडातालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही व यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी वणवण भटकंती करावी लागत आहे. ८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात ५९ महसुल गावे व १४७ पाडे असून दरवर्षीच निम्यापेक्षाा अधिक गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो व या टंचाईग्रस्त गावपाड्याना पाणीपुरवठा करत असताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु यावर्षी मात्र पाणीटंचाईचा प्रश्न आतापासून समोर येवून ठाकला असून फेब्रुवारी महिन्यातच ५ गावे आणि १० पाडे कोरडे पडले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अद्याप कडक उन्हाळा सुरू झाला नाही. त्या आधीच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मार्च-एप्रिल-मे पाणीटंचाईची समस्या गंभीर होईल याचे चित्र आताच डोळ्यासमोर उभे आहे. परंतु याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही.तसेच मुबलक पाणीसाठा असतानाही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव यामुळे तहानलेल्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तालुक्यातील मारूतीची वाडी, कारेगाव, खोप, पळसपाडा, मोऱ्हाडा या ठिकाणी मोठी धरणे आहेत परंतु करोडो रू. खर्चून बांधलेल्या धरणाचा लगतच्या गावपाड्यांना काही एक फायदा झालेला नाही. शासनाने करोडो रू. खर्चून मोठी मोठी धरणे बांधली खरी परंतु त्याचे नियोजन मात्र केलेलेच नाही. यामुळे या धरणाच्या लगतच्या गावपाड्याची घोटभर पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.