शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मोखाडा तहानलेलाच

By admin | Updated: February 17, 2016 01:44 IST

तालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील

रवींद्र साळवे,  मोखाडातालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही व यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी वणवण भटकंती करावी लागत आहे. ८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात ५९ महसुल गावे व १४७ पाडे असून दरवर्षीच निम्यापेक्षाा अधिक गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो व या टंचाईग्रस्त गावपाड्याना पाणीपुरवठा करत असताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु यावर्षी मात्र पाणीटंचाईचा प्रश्न आतापासून समोर येवून ठाकला असून फेब्रुवारी महिन्यातच ५ गावे आणि १० पाडे कोरडे पडले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अद्याप कडक उन्हाळा सुरू झाला नाही. त्या आधीच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मार्च-एप्रिल-मे पाणीटंचाईची समस्या गंभीर होईल याचे चित्र आताच डोळ्यासमोर उभे आहे. परंतु याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही.तसेच मुबलक पाणीसाठा असतानाही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव यामुळे तहानलेल्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तालुक्यातील मारूतीची वाडी, कारेगाव, खोप, पळसपाडा, मोऱ्हाडा या ठिकाणी मोठी धरणे आहेत परंतु करोडो रू. खर्चून बांधलेल्या धरणाचा लगतच्या गावपाड्यांना काही एक फायदा झालेला नाही. शासनाने करोडो रू. खर्चून मोठी मोठी धरणे बांधली खरी परंतु त्याचे नियोजन मात्र केलेलेच नाही. यामुळे या धरणाच्या लगतच्या गावपाड्याची घोटभर पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.