शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये मोटार, रिक्षा जाळली

By admin | Updated: March 13, 2016 02:29 IST

रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते

कल्याण : रिक्षांचे सर्वाधिक परवाने परप्रांतीयांना दिल्याचा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा जाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, त्यांनी हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणाही केली. हे प्रकरण ताजे असतानाच कल्याणच्या भरवस्तीत असलेल्या सह्याद्रीनगर परिसरात वॅगन-आर मोटारीसह रिक्षा जाळण्याचा प्रकार शनिवारी पहाटे घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली.बिर्ला कॉलेजसमोर राहणाऱ्या भगवान निकम यांचा उदरनिर्वाह रिक्षावर अवलंबून होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने त्यांची रिक्षा पेटवून दिली. सर्वत्र धूर पसरताच निकम व इतर रहिवासी घराबाहेर आले. त्या वेळी त्यांना रिक्षासह शेजारी अशोक गिरी यांची वॅगन-आर मोटारही जळत असल्याचे दिसले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीत निकम यांची रिक्षा संपूर्ण जळून खाक झाली, तर गिरी यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रिक्षा खाक झाल्याने निकम यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. या घटनेप्रकरणी निकम व गिरी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)