शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मातृभाषेतील शिक्षण संवेदनशील नागरिक घडवू शकते : प्रा. आदित्य दवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:19 IST

जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या 'सर्ज' या माजी विद्यार्थी संघटनेने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रा. आदित्य दवणे यांचे 'फक्त लढ म्हणा..!' हे व्याख्यान आयोजित केले होते. 

ठळक मुद्देमातृभाषेतील शिक्षण संवेदनशील नागरिक घडवू शकते : प्रा. आदित्य दवणे प्रा. आदित्य दवणे यांचे 'फक्त लढ म्हणा..!' व्याख्यानसुवर्ण मोहित्सवी वर्षात 50 सत्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मानस

ठाणे : हल्ली चारही बाजूने मुलांना करिअर मार्गदर्शन मिळत आहे, परंतु  आज मुलांना गरज आहे ती भावनिक मार्गदर्शनाची, असे वक्तव्य   प्रा. आदित्य दवणे यांनी 'फक्त लढ म्हणा..!' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांना उद्देशून केले. 

मुलांशी संवाद साधताना ते म्हणाले की, स्वतः तली बलस्थानं ओळखून आयुष्याला सामोरे जा. स्वामी विवेकानंदनाच्या 'उठा-जागे व्हा-आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका' या संदेशाची आठवण करून देताना, 'उठा आणि जागे व्हा' या दोन शब्दांमधला अपेक्षित अर्थ सांगितला. मराठी माध्यमातुन शिकणाऱ्या मुलांचे त्यांनी अभिनंदन करत, 'देशाला गरज असेल तर आज संवेदनशील नागरिकांची गरज आहे आणि असे नागरिक मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळाच घडवू शकतात' असे वक्तव्य त्यांनी केले. प्रेम या अडीच अक्षरांचा अर्थ समजावून देताना तुम्ही जिद्द नावाचं भिंग हुडकून काढा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 'जगाला तुमच्या राडकथा ऐकण्यात रस नाही, तुम्ही त्यांना तुमची यशोगाथा ऐकवा, जग तुमचा सत्कार करेल आणि तुमची उदाहरणं भविष्यातील पिढ्यांना देईल' हे वास्तवाचे भान विद्यार्थ्यांना दिले. एकंदरीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम मुलांमुळे रंगला असे त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मत मांडले. व्याख्यानाची सांगता कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या 'कणा' या कवितेने व तिच्या अर्थाने केली. व्याख्यान रोमांचकारी आणि आयुष्याला दिशा देणारे होते असे मत विद्यार्थ्यांनी प्राध्यापक आदित्य दवणेंशी संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिक डॉ. संगीता दीक्षित आणि सर्ज संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे माजी विद्यार्थी स्वप्नील मयेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले. सुवर्ण मोहित्सवी वर्षात 50 सत्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मानस सर्ज या संस्थेचा आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन