शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

ठाणे जिल्ह्यात २२ दिवसांत २५ हजारांहून जास्त रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

ठाणे : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीने हजारचा टप्पा ...

ठाणे : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीने हजारचा टप्पा गाठला. दिवसेंदिवस होत असलेल्या रुग्णवाढीमुळे मृत्यूसंख्याही वाढत आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या २२ दिवसांत नव्या रुग्णांची संख्या २५ हजारांहून अधिक झाली असून, याच कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्या वेळी तुरळक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली होती. कालांतराने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. दोन अंकी रुग्णांची संख्या तीन आणि चार अंकी झाली. त्या वेळी प्रतिदिन आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या एक ते दोन हजारांच्या घरात पोहोचली होती. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४० ते ५० च्या घरात गेली होती. त्यात हा आजार नवा असल्याने उपचारपद्धतीदेखील नीटशी माहीत नव्हती. अशा परिस्थितीतही आरोग्य विभाग दिवसरात्र या आजाराशी लढा देत आहे. ऑक्टोबरनंतर हळूहळू रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले होते. अशातच राज्याचा आर्थिक विकासाचा गाडा रुळावर आणण्यासाठी टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली. त्यानंतरही काही दिवस रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्या वेळी जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २०० ते ३०० च्या घरात होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. २०० ते ३०० च्या घरात असलेल्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचू लागली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर रुग्णांच्या संखेने उच्चांक गाठला. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर १० मार्च रोजी सर्वाधिक एक हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. २१ मार्च रोजी नव्या रुग्णांच्या आकडेवारीने तब्बल दोन हजारांचा टप्पा पार केला.

......................

२८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकूण दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची, तर सहा हजार २७२ मृत्यूची नोंद करण्यात आली. २२ मार्च रोजी नव्याने आढळून येणारे रुग्ण २५ हजार ७००, तर १२० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ९० हजार ६१६, तर ६ हजार ३९२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

.........................