शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

ठाणे जिल्ह्यात २२ दिवसांत २५ हजारांहून जास्त रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

ठाणे : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीने हजारचा टप्पा ...

ठाणे : फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाने पुन्हा हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीने हजारचा टप्पा गाठला. दिवसेंदिवस होत असलेल्या रुग्णवाढीमुळे मृत्यूसंख्याही वाढत आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या २२ दिवसांत नव्या रुग्णांची संख्या २५ हजारांहून अधिक झाली असून, याच कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा ठाणे जिल्ह्यात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्या वेळी तुरळक प्रमाणात रुग्णांची नोंद झाली होती. कालांतराने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. दोन अंकी रुग्णांची संख्या तीन आणि चार अंकी झाली. त्या वेळी प्रतिदिन आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या एक ते दोन हजारांच्या घरात पोहोचली होती. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४० ते ५० च्या घरात गेली होती. त्यात हा आजार नवा असल्याने उपचारपद्धतीदेखील नीटशी माहीत नव्हती. अशा परिस्थितीतही आरोग्य विभाग दिवसरात्र या आजाराशी लढा देत आहे. ऑक्टोबरनंतर हळूहळू रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना यश आले होते. अशातच राज्याचा आर्थिक विकासाचा गाडा रुळावर आणण्यासाठी टाळेबंदीत शिथिलता देण्यात आली. त्यानंतरही काही दिवस रुग्णांची संख्या आटोक्यात होती. त्या वेळी जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २०० ते ३०० च्या घरात होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. २०० ते ३०० च्या घरात असलेल्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचू लागली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर रुग्णांच्या संखेने उच्चांक गाठला. तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर १० मार्च रोजी सर्वाधिक एक हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. २१ मार्च रोजी नव्या रुग्णांच्या आकडेवारीने तब्बल दोन हजारांचा टप्पा पार केला.

......................

२८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकूण दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची, तर सहा हजार २७२ मृत्यूची नोंद करण्यात आली. २२ मार्च रोजी नव्याने आढळून येणारे रुग्ण २५ हजार ७००, तर १२० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या दोन लाख ९० हजार ६१६, तर ६ हजार ३९२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

.........................