शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

२३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या वर्षांच्या भात, नागली व फळबाग विम्यापोटी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३ कोटींची भरपाई मिळाली. या जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील २३ हजारपेक्षा अधिक शेतकरी दोन्ही जिल्ह्यांत कोट्यवधींच्या विमा भरपाई रकमेपासून आजपर्यंत वंचित आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात या प्रधानमंत्री पीकविमा योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपन्यांनी, तर पालघर जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा शेकडो हेक्टर शेतीचा विमा काढलेला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली ठाणे जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार ३२ हजार ६५० शेतकऱ्यांनी भात व नागली पिकांचा विमा काढला होता. त्यासाठी या शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख ३८ हजारांचा हप्ता भरला होता. जिल्ह्यातील २८ हजार ७२९ शेतकऱ्यांना २३ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. तब्बल तीन हजार ९२१ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार हजार ४४७ शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांच्या तब्बल एक कोटी ४० लाख ४७ हजारांचा विमा हप्ता भरला होता. अवघ्या १६ शेतकऱ्यांना फक्त चार लाख ३० हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे. या फळबाग विमा भरपाईच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील तब्बल चार हजार ४३१ शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तर पालघर जिल्ह्यातील ९१० शेतकऱ्यांना भात व नागलीच्या पिकांसाठी दोन कोटी चार लाख ३५ हजारांची विमा भरपाई मिळाली आहे. या भात व नागलीचा विमा काढलेल्या तब्बल १९ हजार १७४ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. तर अवघ्या दोन हजार ३८ शेतकऱ्यांना त्यांच्या फळबाग विम्यापोटी चार कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे.

----------

पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू

यंदाच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंतची मदत दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षाच्या विमाभरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संबंधित कंपन्यांच्या संपर्कात आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहाेत, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.