शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
2
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
3
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
4
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
5
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
6
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
7
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
8
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
9
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
11
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
12
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
13
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
15
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
16
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
17
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
18
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
19
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
20
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य

२३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : केंद्राची ‘प्रधानमंत्री पीकविमा’ योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संकटावर मात करून नवसंजीवनी देणारी आहे. गेल्या वर्षांच्या भात, नागली व फळबाग विम्यापोटी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३ कोटींची भरपाई मिळाली. या जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील २३ हजारपेक्षा अधिक शेतकरी दोन्ही जिल्ह्यांत कोट्यवधींच्या विमा भरपाई रकमेपासून आजपर्यंत वंचित आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात या प्रधानमंत्री पीकविमा योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपन्यांनी, तर पालघर जिल्ह्यातील भात व नागली पिकासाठी एचडीएफसी इरगो इन्शुरन्स व फळपिकासाठी ॲग्रिकल्चर कंपन्यांनी हजारो शेतकऱ्यांचा शेकडो हेक्टर शेतीचा विमा काढलेला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेखाली ठाणे जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार ३२ हजार ६५० शेतकऱ्यांनी भात व नागली पिकांचा विमा काढला होता. त्यासाठी या शेतकऱ्यांना एक कोटी सहा लाख ३८ हजारांचा हप्ता भरला होता. जिल्ह्यातील २८ हजार ७२९ शेतकऱ्यांना २३ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांची भरपाई या शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. तब्बल तीन हजार ९२१ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे.

ठाणे जिल्ह्यातील चार हजार ४४७ शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागांच्या तब्बल एक कोटी ४० लाख ४७ हजारांचा विमा हप्ता भरला होता. अवघ्या १६ शेतकऱ्यांना फक्त चार लाख ३० हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे. या फळबाग विमा भरपाईच्या लाभापासून ठाणे जिल्ह्यातील तब्बल चार हजार ४३१ शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तर पालघर जिल्ह्यातील ९१० शेतकऱ्यांना भात व नागलीच्या पिकांसाठी दोन कोटी चार लाख ३५ हजारांची विमा भरपाई मिळाली आहे. या भात व नागलीचा विमा काढलेल्या तब्बल १९ हजार १७४ शेतकरी या विमा भरपाईच्या लाभापासून वंचित आहेत. तर अवघ्या दोन हजार ३८ शेतकऱ्यांना त्यांच्या फळबाग विम्यापोटी चार कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांची भरपाई मिळाली आहे.

----------

पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरू

यंदाच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंतची मदत दिलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षाच्या विमाभरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. या वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संबंधित कंपन्यांच्या संपर्कात आहे. यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत आहाेत, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.