शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बीएसयूपीच्या २३८३ घरांचे महिनाअखेरीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:23 IST

आयुक्तांनी घेतला आढावा : बाधितांसह दिव्यांगांना लाभ

ठाणे : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयूपी प्रकल्पांतर्गत एकाचवेळी जवळपास २३८३ इतक्या सदनिकांचे वितरण या महिनाअखेर प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना वितरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत तुळशीधाम येथे १६१ सदनिका, सागर्ली रिव्हर वूड्स, कल्याणफाटा येथे ९५, पडलेगाव ६५५, कासारवडवली ६३, ब्रह्मांड ३०, सिद्धार्थनगर, कोपरी (पू.) येथे २८०, खारटन रोड येथे १४४, महात्मा फुलेनगर, कळवा येथे १४३ आणि टेकडी बंगला येथे १८५ सदनिका महापालिकेस प्राप्त होणार आहेत.पायाभूत सुविधांची कामे त्वरित पूर्ण करायातील १४४२ सदनिका शहरातील विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या लोकांना प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत. तसेच ७५२ सदनिका या अस्तित्वातील पात्र रहिवाशांना वितरित करण्यात येणार आहेत. १९० सदनिका या दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून त्याची सर्व प्रक्रि या करून त्या वितरित करण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले.त्याचप्रमाणे गावदेवी येथील बाधितांना तसेच कळवा खाडीपूल येथील बाधित मातंग समाजाच्या लोकांनाही बीएसयूपीमधील सदनिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व ठिकाणांची पाहणी करून रस्ते, वीज, पाणी, मलनि:सारण व्यवस्था आदी कामे सुरू असतील, तर ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, मलनि:सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे