शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

जून-जुलै महिन्यांत ठाणे-पालघरमध्ये १८० सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 03:49 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला

ठाणे : पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते बचावले आहेत. यात जून-जुलै महिन्यांत सर्पदंश झालेले १८० जण आहेत.

यंदा पावसाने कोकणपट्ट्यात दमदार हजेरी लावल्याने ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांनाही जमिनीखाली राहणे असह्य झाले. त्यातूनच जमिनीवर वास्तव्यास आल्यावर जून महिन्यात १०३ जणांना, तर जुलै महिन्यात ७३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. एप्रिलमध्ये १५ आणि मे महिन्यात १३ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली. सर्व रुग्ण प्रामुख्याने ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. एखादा सर्प चावल्यावर एकतर मानवी स्नायू आणि रक्त तसेच मेंदूवर विषाचा मारा करतो. तसेच त्याचे परिमाण मानवी शरीरावर तत्काळ सुरू झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे त्याच्यावर औषधोपचार केले जातात. औषधांची मात्रा ही रुग्णांवर होणाºया परिणामानुसार वाढवली जाते.वेळेत औषधोपचार होणे गरजेचेच्सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत औषधोपचार मिळाल्यावर ती वाचते. मध्यंतरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मण्यारने दंश झालेल्या आजीबार्इंना वाचवण्यात यश आले होते.

टॅग्स :snakeसापthaneठाणे