शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक काळातही ‘त्यांची’ रोजी-रोटी गाढवांच्या पाठीवर

By admin | Updated: February 8, 2017 03:58 IST

जग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत

राहुल वाडेकर, विक्रमगडजग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत आहेत. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील गावागावात सध्या गाढवांच्या पाठीवर दगडी जाते आणि पाटे वाहून नेऊन ती विकणारे पाथरवट दिसत दिसत आहेत. या व्यवसायातून जे काही मिळेल त्यामध्ये कुटुंबाची गुजराण करायाची असा त्याचा नित्यक्रम असून जा दिवशी मिळेल त्या दिवशी तुपाशी नाही मिळेल त्या दिवशी उपाशी असे त्यांचे जगण्याचे गणित आहे.सध्या पाथरवट समाजातील काही कुटुंब आपल्या गाढवांसह उदरनिर्वाहासाठी सध्या जळगावहून स्थलांतर करून विक्र मगड आणि वाडा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाली येथे रस्त्याच्या कडेला तंबू टाकून राहायला आलेले आहेत. घरातील पुरुष दररोज सकाळ झाल्यानंतर आपल्या छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने आपल्या कलेच्या सहायाने बनविलेली दगडी जाते-पाटे, वरवंटा, रगडा गाढवांच्या पाठीवर लादून गावोगावी विकण्याचा प्रयत्न करीत असतात. एखाद्या दिवशी २ ते ३ जाती विकली जातात तर एखाद्या दिवशी एकही जाते-पाटे विकले जात नाही. मात्र, पोटा-पाण्यासाठी त्यांना ही भटकंती करावीच लागते. एक जाते ४०० ते ५०० रूपयाला आणि २५० ते ३०० रुपयाला पाटा- वरवंटा विकला जातो. छिन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जाते आदी वस्तू तयार करणाऱ्या पाथरवट समाजाची आता फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. कारण या सर्व दगडी वस्तूंची जागा आता मिक्सर, ग्रार्इंडर सारख्या विविध इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने या दगडी वस्तूंना मागणी नाही त्यामुळे हा व्यवसाय लोप पावत चालला आहे. नोटाबंदीचा फटका विक्र मगड येथील व्यवसायीक लाला आप्पा धिंडे हे गेल्या ७० वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. परंतु आजवर अशी मंदी कधीच पाहिली नसल्याचे ते सांगत आहेत. कारण अगोदरच या व्यवसायाला आधुनिक युगामध्ये तयार होत असलेल्या इलेक्ट्रॉनीक वस्तंूमुळे घरघर लागली आहे. आता त्यामध्ये भर पडली आहे ती नोटाबंदीची. जव्हार, विक्र मगड, मोखाडा व ग्रामीण भागामध्ये मंदीचे सावट पसरलेले असल्याने हया आठवडाभरात बोहोणी सुध्दा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.दगडी उखळ हे शुभ कार्याच्यावेळी घरातील देवघरात पुजले जाते मुखत्वेकरुन उखळीची गरज लग्नघरात लागतेच, तर पाटा देखील लग्नघरी नवरदेवाला अगर नवरीला लावण्यासाठी लागणारी हळद अदल्या दिवशी दळण्याकरीता व फोडण्याकरीता वापरतात व हे सारे आजही तितक्याच जुन्या रूढी परंपरेनुसार ग्रामीण भागात करतातच पण शहरी भागात या परंपरा जपल्या जात नसल्याचे दिसते. शहरात या चिजा मिळाल्या नाहीतर बऱ्याचदा त्या गावावरून मागवून ही परंपरा जपली जाते आहे. असे असले तरी हा व्यवसाय काळाच्या पडद्याआड जातो आहे.