शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

आधुनिक काळातही ‘त्यांची’ रोजी-रोटी गाढवांच्या पाठीवर

By admin | Updated: February 8, 2017 03:58 IST

जग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत

राहुल वाडेकर, विक्रमगडजग कितीही अधुनिकतेकडे गेले तरी आजही समाजातील अनेक दुर्बल घटकांना आपल्या पोटा-पाण्यासाठी वणवण भटकंती करायला लावणारे पारंपरीक व्यवसाय करावे लागत आहेत. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील गावागावात सध्या गाढवांच्या पाठीवर दगडी जाते आणि पाटे वाहून नेऊन ती विकणारे पाथरवट दिसत दिसत आहेत. या व्यवसायातून जे काही मिळेल त्यामध्ये कुटुंबाची गुजराण करायाची असा त्याचा नित्यक्रम असून जा दिवशी मिळेल त्या दिवशी तुपाशी नाही मिळेल त्या दिवशी उपाशी असे त्यांचे जगण्याचे गणित आहे.सध्या पाथरवट समाजातील काही कुटुंब आपल्या गाढवांसह उदरनिर्वाहासाठी सध्या जळगावहून स्थलांतर करून विक्र मगड आणि वाडा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाली येथे रस्त्याच्या कडेला तंबू टाकून राहायला आलेले आहेत. घरातील पुरुष दररोज सकाळ झाल्यानंतर आपल्या छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने आपल्या कलेच्या सहायाने बनविलेली दगडी जाते-पाटे, वरवंटा, रगडा गाढवांच्या पाठीवर लादून गावोगावी विकण्याचा प्रयत्न करीत असतात. एखाद्या दिवशी २ ते ३ जाती विकली जातात तर एखाद्या दिवशी एकही जाते-पाटे विकले जात नाही. मात्र, पोटा-पाण्यासाठी त्यांना ही भटकंती करावीच लागते. एक जाते ४०० ते ५०० रूपयाला आणि २५० ते ३०० रुपयाला पाटा- वरवंटा विकला जातो. छिन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जाते आदी वस्तू तयार करणाऱ्या पाथरवट समाजाची आता फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. कारण या सर्व दगडी वस्तूंची जागा आता मिक्सर, ग्रार्इंडर सारख्या विविध इलेक्ट्रॉनिक साधनांनी घेतल्याने या दगडी वस्तूंना मागणी नाही त्यामुळे हा व्यवसाय लोप पावत चालला आहे. नोटाबंदीचा फटका विक्र मगड येथील व्यवसायीक लाला आप्पा धिंडे हे गेल्या ७० वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. परंतु आजवर अशी मंदी कधीच पाहिली नसल्याचे ते सांगत आहेत. कारण अगोदरच या व्यवसायाला आधुनिक युगामध्ये तयार होत असलेल्या इलेक्ट्रॉनीक वस्तंूमुळे घरघर लागली आहे. आता त्यामध्ये भर पडली आहे ती नोटाबंदीची. जव्हार, विक्र मगड, मोखाडा व ग्रामीण भागामध्ये मंदीचे सावट पसरलेले असल्याने हया आठवडाभरात बोहोणी सुध्दा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.दगडी उखळ हे शुभ कार्याच्यावेळी घरातील देवघरात पुजले जाते मुखत्वेकरुन उखळीची गरज लग्नघरात लागतेच, तर पाटा देखील लग्नघरी नवरदेवाला अगर नवरीला लावण्यासाठी लागणारी हळद अदल्या दिवशी दळण्याकरीता व फोडण्याकरीता वापरतात व हे सारे आजही तितक्याच जुन्या रूढी परंपरेनुसार ग्रामीण भागात करतातच पण शहरी भागात या परंपरा जपल्या जात नसल्याचे दिसते. शहरात या चिजा मिळाल्या नाहीतर बऱ्याचदा त्या गावावरून मागवून ही परंपरा जपली जाते आहे. असे असले तरी हा व्यवसाय काळाच्या पडद्याआड जातो आहे.