शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मोबाइलने ‘मेमरी’ केली फॉरमॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

बुद्धीला चालना देणारे प्रत्यक्ष खेळ खेळण्यावर हवा भर स्टार ८८४ अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मोबाइल येण्याआधी ...

बुद्धीला चालना देणारे प्रत्यक्ष खेळ खेळण्यावर हवा भर

स्टार ८८४

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मोबाइल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक पाठ असायचे. आता मोबाइल मेमरीमुळे स्वत:चा सोडला तर कोणाचाच नंबर लक्षात राहत नाही. स्वत:चे एकापेक्षा जास्त नंबर्स असतील, तर तेही लक्षात राहत नाहीत. मोबाइलमुळे आपल्या मेमरीवर परिणाम झाला आहे. जे मोबाइल वापरत नाहीत त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत नाही, स्मरणशक्तीचा वापर करत नाही.

त्याचे भविष्यात खूप वाईट परिणाम होऊ शकतात. वेळीच मुलांनी, पाल्यांनी सुधारायला हवं. लॉकडाऊन काळात तर मोबाइलचा वापर खूप वाढला आहे, आबालवृद्ध त्यावर व्यस्त असल्याचे आढळून येते. हे योग्य नसून याचे गंभीर पडसाद नजीकच्या काळात दिसतील, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

-----------------

असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष

पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे

बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

-----------------------------

हे टाळण्यासाठी...

एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मोबाइल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे त्याला ‘मोबाइल फास्ट’ असे नाव द्यायचे.

झोपण्याच्या ठिकाणी मोबाइल घेऊन जाऊ नये, पुरेशी झोप घ्यायलाच हवी

मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाइलवरील गेम नव्हे

पाठांतर करणे

स्तोत्र मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन करणे

प्राणायाम, योग, व्यायाम करणे

मन विचलित न होऊ देता एकाग्रता वाढीस लावणे

--------------------------

कोट

मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद कमी झाला आहे. हे धोकादायक आहे. त्यात ऑनलाइन संस्कृती अधिक वाट लावत आहे. वेळीच कुटुंबाने `मोबाइल फास्ट` ही संकल्पना राबवावी. एक दिवस कोणतीही स्क्रीन बघायची नाही. केवळ बुद्धीचा वापर करून कार्यरत राहायचे. जेणेकरून त्या सगळ्या यंत्रणावर (अँडिक्ट) अवलंबून राहणे कमी होईल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य देणे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे. योग्य झोप, व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. कारण मोबाइलने मेमरी घालवली हे वास्तव नाकारून चालणार नाही.

- डॉ. विजय चिंचोले, मानसोपचारतज्ज्ञ

-------------

एकाच कुटुंबातील प्रतिक्रिया मिळाल्या की टाकतो

.........