शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घर बांधण्यासाठी आता एमएमआरडीएची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:23 IST

जि.प.सीईओ : ग्रामपंचायतींना अधिकार नाही

ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसाठी याआधी ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला लागत असे. मात्र, आता ग्रा.पं.च्या या दाखल्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित बांधकामासाठी एमएमआरडीए किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी ग्रा.पं.ला दिले. यामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एमएमआरडीए क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना घर बांधायचे असल्यास त्यांना आता एमएमआरडीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर, एमएमआरडीए क्षेत्राबाहेरील ग्रा.पं. असल्यास बांधकामासाठी जिल्हाधिकाºयांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या दाखल्यांवर न्यायालयाने हरकत घेतली आहे. यास अनुसरून ग्रा.पं.चे नाहरकत दाखले बंद केल्याचे सूतोवाच सीईओ यांनी केले. यावर मात्र जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून ग्रा.पं.कडे नाहरकत दाखल्याचे अधिकार ठेवण्याची मागणी लावून धरली आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला असता त्यावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांनी सहभाग घेऊन नाराजी व्यक्त केली. भिवंडी, शहापूर आदी तालुक्यांसह अन्यही ठिकाणच्या सदस्यांनी बांधकामास नाहरकत दाखला देण्याचा ग्रा.पं.चा अधिकार कायम ठेवण्याची मागणी लावून धरली. गावातील गरिबाला घर बांधायचे झाल्यास तो सहज बांधत असे. पण, आता बांधता येणार नाही.सदस्यांनी व्यक्त केली खंतबांधकाम करण्यात येणारी जागा गावठाणाची असेल, तर संबंधित ग्रा.पं.ला नाहरकत दाखल देता येईल. पण, त्यासाठीदेखील ग्रामसभेची परवानगी लागेल. तरच तो येईल. कायद्यातील तरतुदीस अनुसरून ग्रा.पं.ना आदेश दिले असल्याचे सीईओ यांनी सभागृहात नमूद केले. ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याचा आरोपही यावेळी काही सदस्यांनी केला. यामुळे आता ग्रामस्थांना, गोरगरिबांना सहजासहजी घर बांधता येणार नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त करून ग्रामपंचायतींचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.