शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

दोनच पूल बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:20 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या तीन पुलांऐवजी (अंडरपास) केवळ दोनच पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

- राजू काळे भार्इंदर: पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या एकमेव मुख्य मार्गावरील वाहतूककोंडीचे नियोजन करण्याकरिता व जलद वाहतुकीसाठी मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या तीन पुलांऐवजी (अंडरपास) केवळ दोनच पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. तसेच पालिकेने मीरा रोड येथे प्रस्तावित केलेल्या उड्डाणपुलाचा व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तपासून निर्णय घेणार असल्याचे पालिकेला कळवले आहे.शहरात व शहराबाहेर येजा करण्यासाठी भार्इंदर पूर्वेकडील फाटकापासून ते पश्चिम महामार्गापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव मुख्य मार्ग उपलब्ध आहे. या मार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड प्रस्तावित असतानाही ते तेथील अतिक्रमणांमुळे अद्याप मार्गी लागलेले नाहीत. यामुळे वाढत्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता अपुरा पडत आहे. परिणामी, येथे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यातच जागोजागी सिग्नल बसवण्यात आल्याने वाहनांची गती मंदावते.वाहतुकीची गती वाढवण्यासाठी पालिकेने गोल्डन नेस्ट सर्कल ते दीपक हॉस्पिटल, शिवार गार्डन ते एस.के. स्टोन व प्लेझंट पार्क ते सिल्व्हर पार्कदरम्यान ३७७ कोटी ६६ लाख रुपये खर्चाचे तीन पूल प्रस्तावित केले होते. हे पूल उभारण्याकरिता एमएमआरडीएद्वारे कर्ज व बांधकामाची परवानगी मिळावी, याकरिता पालिकेने २०१६ मध्ये राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. परंतु, एमएमआरडीएने पालिकेच्या मर्यादित उत्पन्नावर बोट ठेवून पालिकेला कर्ज देण्यास नकार दिला. हे पूल एमएमआरडीएने स्वखर्चातून बांधले, यासाठी आ. नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. अखेर, मुख्यमंत्र्यांनी २३ मार्च २०१६ रोजीच्या एमएमआरडीए बैठकीत तीन पूल एमएमआरडीएच्या खर्चातून बांधण्यास मान्यता दिली. परंतु, एमएमआरडीएने त्या तीन उड्डाणपुलांसाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूदच केली नाही.>अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णयएमएमआरडीएने हे पूल मेट्रो प्रकल्पात समाविष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट केले. परंतु, तीन वाहतूक पुलांऐवजी केवळ शिवार गार्डन ते एस.के. स्टोन व गोल्डन नेस्ट सर्कल ते दीपक हॉस्पिटलदरम्यान केवळ दोनच पूल बांधणार असल्याचे पालिकेला कळवले आहे.शहराच्या पूर्व-पश्चिमेकडे येजा करण्यासाठी भार्इंदर येथे एकमेव भारतरत्न स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल व तीन मीटर उंचीपर्यंतच्या वाहनांसाठी उत्तरेला एकमेव भुयारी मार्ग उपलब्ध आहे. त्यांना पर्याय म्हणून मीरा रोड येथे पूर्व-पश्चिमेला जोडणारा पर्यायी उड्डाणपूल एमएमआरडीएच्या निधीतून बांधण्याचा प्रस्ताव पालिकेने सादर केला होता. मीरा रोडच्या पूर्व भागात दाट लोकवस्ती असून पश्चिमेला मात्र लोकवस्ती नाही. त्यामुळे प्रस्तावित उड्डाणपूल किती व्यवहार्य ठरणार, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे एमएमआरडीएने पालिकेला कळवले आहे.>तीन पुलांची आवश्यकता असताना एमएमआरडीएने दोनच पुलांना मंजुरी दिली आहे. त्याचे आराखडे पालिकेला लवकरच प्राप्त होणार असून त्यांची व्याप्ती पाहूनच आणखी एका पुलाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. मीरा रोड पश्चिमेस अनेक गृहप्रकल्प प्रस्तावित आहेत. तसेच प्रस्तावित उड्डाणपूल झाल्यास उत्तन येथे कमी वेळेत पोहोचता येणार आहे. यामुळे इंधन व वेळेची बचत होणार असल्याने उड्डाणपुलाची निकड एमएमआरडीएच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.- नरेंद्र मेहता, आमदार, भाजपा