शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

भाईंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानाचा दुरुपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:30 IST

धार्मिकऐवजी व्यावसायिक कार्यक्रम : खरकटे अन्न, कचऱ्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य, नागरिक संतप्त

भार्इंदर : महापालिकेच्या भार्इंदरमधील बाळासाहेब ठाकरे मैदानात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली परवानगी घेऊन व्यावसायिक कार्यक्रम करण्यात आला. इतकेच नव्हे तर मैदानातील खरकटे अन्न, कचरा टाकून दुरवस्था करण्यात आली. गवत नष्ट करण्यासह विजेच्या चोरीचा प्रकारही आयोजकांनी केला असतानाही महापालिका कारवाईस टाळाटाळ करत आहे. तर, मैदानाची दुरवस्था झाल्याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनीही तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

भार्इंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीमध्ये एकमेव हे मैदान आहे. हे मैदान मोठे असून सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासह व्यायाम, योगा करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. शिवाय, मुलांना खेळण्यासाठी हेच एकमेव मैदान आहे. एमआरटीपी कायद्यानुसार मैदान केवळ वर्षातून ३० दिवसांसाठी धार्मिक आणि राष्ट्रीय दिवस, महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमासाठीच देणे बंधनकारक आहे. त्यातही मुले, नागरिकांना खेळण्यास मिळावे म्हणून शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मैदाने भाड्याने देऊ नये, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. प्रभाग समिती कार्यालय व काही कर्मचारी, लोकप्रतिनिधी-राजकारण्यांच्या संगनमताने सर्रास नियम-निर्देशांचे उल्लंघन केले जात आहे. शिवाय, मैदान भाड्याने दिल्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे गवत नष्ट होऊन लाखो रुपयांचे नुकसान पालिकेचे होत आहे.

५ व ६ एप्रिलसाठी प्रभाग समिती-४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी विनोद सिंह व सुनील जैन यांच्या नावे धार्मिक कार्यक्रमासाठी म्हणून ठाकरे मैदान भाड्याने दिले होते. दोन दिवसांचे मिळून १० हजार भाडे व सुमारे १३ हजार अनामत रक्कम घेण्यात आली.परंतु, ६ एप्रिल रोजी मैदानासमोरील इमारतीत एका बिल्डरच्या कार्यालयाचे उद्घाटन होते. यानिमित्ताने मैदानात भव्य स्टेज, रोषणाई, जेवणाची व्यवस्था केली होती. मोठ्या संख्येने गॅस सिलिंडरचा वापर केला गेला.

या कार्यक्रमास बिल्डरने अभिनेता जितेंद्र तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांना बोलावले होते. बिल्डरांच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. शिवाय, नृत्याचाही कार्यक्रम झाला. जनरेटर असले तरी पालिकेच्या वीजजोडणीतून चोरीने वीजपुरवठा घेण्यात आला होता. दुसºया दिवशी सकाळी जेव्हा नागरिक फिरायला आले, तेव्हा मैदानात घाण पाणी, खरकटे व कचरा पडला होता. दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. मुलांना खेळणे तर दूर नागरिकांनी फेरफटका मारणेही टाळले.घडल्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आयोजकांसह बेजबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.