शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

रेल्वे अपघातग्रस्तांना मिस्ड कॉलचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:37 IST

रेल्वे अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब लागत असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवलीतील श्री सदगुरूकृपा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.

डोंबिवली: रेल्वे अपघातात मरण पावलेल्या किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्यास विलंब लागत असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवलीतील श्री सदगुरूकृपा सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. मदतीपासून वंंचित असलेल्या पीडित कुटुंबांनी आमच्या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, आम्ही त्यांना फोन करू आणि एक रूपयाही मोबदला न घेता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करू, असे आवाहन संस्थेने केले आहे.रेल्वेचा अपघात झाल्यानंतर अपघाताचे ठिकाण, अपघातग्रस्तांचा पत्ता याबाबत अनेकदा पोलिसांकडून योग्य प्रकारे माहितीची नोंद घेतली जात नाही. त्यामुळे अपघातग्रस्त तसेच मृतांच्या नातेवाईकांना योग्यप्रकारे आर्थिक मदत पोहोचविण्यात किंवा ती मिळण्यात अडचणी येत असल्याकडे संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी लक्ष वेधले. अनेकदा रेल्वे प्रशासनाकडूनही पीडितांना मदत मिळण्यास विलंब लागतो. या काळात अपघातग्रस्त व्यक्तीची तसेच कुटुंबाची पूर्णत: वाताहत होत असल्याने आमची संस्था पुढाकार घेऊन लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले. रेल्वे अपघाताबरोबरच रस्ता अपघातातील पीडितांनीही संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत म्हात्रे यांनी केले.पीडितांची ही बाजू उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. वेळप्रसंगी आमची सर्वाेच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.