शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

By admin | Updated: August 30, 2015 23:22 IST

मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी

भार्इंदर : मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी सांगिले. मात्र, दूषित पाण्याचा शोध घेण्याऐवजी पालिकेने रहिवाशांनाच नोटीसा पाठवून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अजब सल्ला दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर २५० हुन अधिक कुटुंबांचे वास्तव्य असलेले ९ इमारतींचे सुंदरनगर हे गृहसंकुल वसले आहे. त्याला पालिकेच्या जलवाहिनीतून डिसेंबर २०१४ पासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी रहिवाशांनी काही राजकीय मंडळींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालिकेने दूषित पाणीपुरवठा कुठून होतो, त्याचा शोध घेतला नाही. मात्र त्यानंतरच्या कालावधीत रहिवाशांना दूषितऐवजी रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. तद्नंतर मागीलप्रमाणे पुन्हा दूषित पाणी येऊ लागल्याने रहिवाशांनी पालिकेकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याचा शोध घेण्याऐवजी २० आॅगस्ट रोजी रहिवाशांनाच नोटीसा बजावून त्यात पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या बदलून त्या नवीन जलवाहिनीवरुन घ्याव्यात. त्यासाठी प्रती कुटुंबाने ५०० रु. प्रमाणे तर उर्वरीत खर्च सोसायटीने करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ए - ५ व ए - ६ या इमारतीतील रहिवाशांनी जुनी जलवाहिनी काढून पालिकेच्या नवीन जलवाहिनीवरुन नवीन नळजोडणी घेतली. तरीदेखील त्यांना पुन्हा दूषित पाणीपुरवठाच सुरु झाल्याने त्याचा शोध रहिवाशांनी घेतला असता २००१ मध्ये टाकलेल्या पालिकेच्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांना स्वच्छ तर २००८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान हे दूषित पाणी प्यायल्याने येथील ५२ जणांना कावीळ झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेतली असता उपमहापौरांनी गृहसंकुलाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावर त्यांनी बोलविलेल्या बैठकीत पालिकेच्या नवीन जलवाहिनीस कुठेतरी गळती झाल्यानेच रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असून दिलेल्या नळजोडण्या पुन्हा जुन्या जलवाहिनीवरुन देण्याचे निर्देश दिले. परंतु, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी (३१ आॅगस्ट) वरिष्ठ अधिकाऱ्यांसाबेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.(प्रतिनिधी)