शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

By admin | Updated: August 30, 2015 23:22 IST

मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी

भार्इंदर : मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी सांगिले. मात्र, दूषित पाण्याचा शोध घेण्याऐवजी पालिकेने रहिवाशांनाच नोटीसा पाठवून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अजब सल्ला दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर २५० हुन अधिक कुटुंबांचे वास्तव्य असलेले ९ इमारतींचे सुंदरनगर हे गृहसंकुल वसले आहे. त्याला पालिकेच्या जलवाहिनीतून डिसेंबर २०१४ पासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी रहिवाशांनी काही राजकीय मंडळींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालिकेने दूषित पाणीपुरवठा कुठून होतो, त्याचा शोध घेतला नाही. मात्र त्यानंतरच्या कालावधीत रहिवाशांना दूषितऐवजी रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. तद्नंतर मागीलप्रमाणे पुन्हा दूषित पाणी येऊ लागल्याने रहिवाशांनी पालिकेकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याचा शोध घेण्याऐवजी २० आॅगस्ट रोजी रहिवाशांनाच नोटीसा बजावून त्यात पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या बदलून त्या नवीन जलवाहिनीवरुन घ्याव्यात. त्यासाठी प्रती कुटुंबाने ५०० रु. प्रमाणे तर उर्वरीत खर्च सोसायटीने करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ए - ५ व ए - ६ या इमारतीतील रहिवाशांनी जुनी जलवाहिनी काढून पालिकेच्या नवीन जलवाहिनीवरुन नवीन नळजोडणी घेतली. तरीदेखील त्यांना पुन्हा दूषित पाणीपुरवठाच सुरु झाल्याने त्याचा शोध रहिवाशांनी घेतला असता २००१ मध्ये टाकलेल्या पालिकेच्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांना स्वच्छ तर २००८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान हे दूषित पाणी प्यायल्याने येथील ५२ जणांना कावीळ झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेतली असता उपमहापौरांनी गृहसंकुलाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावर त्यांनी बोलविलेल्या बैठकीत पालिकेच्या नवीन जलवाहिनीस कुठेतरी गळती झाल्यानेच रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असून दिलेल्या नळजोडण्या पुन्हा जुन्या जलवाहिनीवरुन देण्याचे निर्देश दिले. परंतु, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी (३१ आॅगस्ट) वरिष्ठ अधिकाऱ्यांसाबेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.(प्रतिनिधी)