शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये ५२ जणांना कावीळ

By admin | Updated: August 30, 2015 23:22 IST

मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी

भार्इंदर : मीरारोडच्या सुंदरनगर गृहसंकुलातील २५५ कुटुंबाला गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून त्यातील ५२ जणांना कावीळ झाल्याचे त्यातील रहिवाशांनी सांगिले. मात्र, दूषित पाण्याचा शोध घेण्याऐवजी पालिकेने रहिवाशांनाच नोटीसा पाठवून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा अजब सल्ला दिला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावर २५० हुन अधिक कुटुंबांचे वास्तव्य असलेले ९ इमारतींचे सुंदरनगर हे गृहसंकुल वसले आहे. त्याला पालिकेच्या जलवाहिनीतून डिसेंबर २०१४ पासून सातत्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लागावी, यासाठी रहिवाशांनी काही राजकीय मंडळींकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालिकेने दूषित पाणीपुरवठा कुठून होतो, त्याचा शोध घेतला नाही. मात्र त्यानंतरच्या कालावधीत रहिवाशांना दूषितऐवजी रहिवाशांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ लागला. तद्नंतर मागीलप्रमाणे पुन्हा दूषित पाणी येऊ लागल्याने रहिवाशांनी पालिकेकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याचा शोध घेण्याऐवजी २० आॅगस्ट रोजी रहिवाशांनाच नोटीसा बजावून त्यात पालिकेच्या जुन्या जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या बदलून त्या नवीन जलवाहिनीवरुन घ्याव्यात. त्यासाठी प्रती कुटुंबाने ५०० रु. प्रमाणे तर उर्वरीत खर्च सोसायटीने करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ए - ५ व ए - ६ या इमारतीतील रहिवाशांनी जुनी जलवाहिनी काढून पालिकेच्या नवीन जलवाहिनीवरुन नवीन नळजोडणी घेतली. तरीदेखील त्यांना पुन्हा दूषित पाणीपुरवठाच सुरु झाल्याने त्याचा शोध रहिवाशांनी घेतला असता २००१ मध्ये टाकलेल्या पालिकेच्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांना स्वच्छ तर २००८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीवरुन जोडलेल्या ११ नळजोडण्यांतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान हे दूषित पाणी प्यायल्याने येथील ५२ जणांना कावीळ झाल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी उपमहापौर प्रवीण पाटील यांच्याकडे धाव घेतली असता उपमहापौरांनी गृहसंकुलाला भेट देऊन माहिती घेतली. त्यावर त्यांनी बोलविलेल्या बैठकीत पालिकेच्या नवीन जलवाहिनीस कुठेतरी गळती झाल्यानेच रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत असून दिलेल्या नळजोडण्या पुन्हा जुन्या जलवाहिनीवरुन देण्याचे निर्देश दिले. परंतु, त्यावर ठोस निर्णय न झाल्याने सोमवारी (३१ आॅगस्ट) वरिष्ठ अधिकाऱ्यांसाबेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येणार असल्याचे उपमहापौरांनी सांगितले.(प्रतिनिधी)