शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक, भाजपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 14:44 IST

शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले

मीरारोड, दि.  4 - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शांती नगर प्रभाग २० ब च्या भाजपा उमेदवार डॉ. नयना मनोज वसाणी यांनी शपथपत्रात गुन्ह्यांची माहिती देताना ७ वर्ष कारावास व द्रव्य दंडाच्या शिक्षेची तरतुद असलेले कलम लपवले तसेच शैक्षणिक पात्रता लपवली म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. या मुळे भाजपाला धक्का बसलाय.मीरारोडच्या शांती नगर भागातील प्रभाग क्र. २० हा भाजपाला चांगलाच डोकेदुखीचा ठरलाय. भाजपाचे विद्यमान नगरसेवक दिनेश जैन यांना डावलुन आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेच्या प्रशांत दळवी यांना भाजपात घेत उमेदवारी अर्ज भरायला सांगीतला. त्यावरुन जैन यांनी थेट हक्काची उमेदवारी दिली नाही तर शिवसेनेत जाणार असा इशारा देताच दळवी यांना प्रभाग १७ मध्ये पाठवण्यात आले. परंतु जैन यांच्या सह भाजपाने भावेश गांधी यांना पण बी फॉर्म दिल्याने जैन यांची डोकेदुखी वाढवली. सुदैवाने जैन यांनी आधी अर्ज भरला असल्याने त्यांना भाजपाचा अधिकृत उमेदवार म्हणुन निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहिर केले.याच प्रभागातुन महिलांच्या इत्तर मागासवर्ग प्रवर्गातुन भाजपाने हेतल परमार यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगीतले. भाजपाचे पॅनल मधले अन्य उमेदवार दिनेश जैन, नगरसेविका डॉ. नयना वसाणी व नगरसेवक अश्विन कासोदरीया सह परमार अर्ज भरण्यास गेल्या असता त्यांना फोन करुन अर्जभरु नका म्हणुन भाजपा कडुन सांगण्यात आले. आ. मेहतांनी सुधीर कांबळी यांच्या पत्नीस अर्ज भरण्यास सांगीतले. पण अर्ज भरण्याची तयारी केली असता आयत्या वरती कांबळींचा पत्ता कापत परमार यांना उमेदवारी बहाल केली.दरम्यान गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास छाननीच्या वेळी शिवसेनेच्या दिप्ती भट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा जैन यांनी वसाणी यांनी अर्जा सोबत जोडलेल्या शपथपत्रात व नंतर दिलेल्या अतिरीक्त शपथपत्रात गुन्ह्याची माहिती देताना भादविचे कलम ४५२ चा उल्लेखच केला नसल्याने त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांच्या कडे केली.कदम यांनी छाननी नंतर यावर सायं. ५ च्या सुामारस सुनावणी घेतली. वसाणी यांच्या वतीने आपण गुन्ह्याची माहिती लपवली नसुन सदरचे कलम जागा कमी असल्याने चुकुन राहिले व ती टायपिंग मिस्टेक असल्याचे सांगीतले.तर सीमा जैन यांच्या वतीने अ‍ॅड. विक्रम तारे-पाटील यांनी युक्तीवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ५ फेब्रुवारी २०१५ च्या आदेशाचा संदर्भ दिला. उमेदवार निवडणुक लढत असताना लोकां कडुन मतं मागत असतो. त्यावेळेस विशेषत: गुन्ह्यां बाबतची सर्व माहिती देणे हा शपथपत्राचा मुख्य उद्देश आहे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटल्याचे तारे पाटील यांनी सांगीतले. वसाणी यांनी जाणुन बुजुन दोन वेळा शपथपत्रात या गंभीर कलमाची माहिती लपवली. दिप्ती भट यांच्या वतीने अ‍ॅड. धीरज श्रीवास्तव यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा मुद्दा लावुन धरला.या मुळे राम नगर येथील कार्यालयात तसेच बाहेर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार मोठ्या संख्येने जमु लागले. भाजपाचे आमदार, नेते मंडळींनी देखील हजेरी लावली. गर्दी वाढत असल्याने पोलिस निरीक्षक धनाजी कलंत्रे व सहकारयांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बाहेर काढले.रात्री ८ वाजता निकाल देणार असे निवडणुक निर्णय अधिकारी अर्चना कदम यांनी म्हटले होते. पण मध्यरात्री त्यांनी आपला लेखी निर्णय दिला. कदम यांनी आपल्या निष्कर्षात उमेदवार वसाणी यांना संबंधित कलमा बाबत सुंपुर्ण माहिती होती. तरी देखील त्यांनी ती माहिती शपथपत्रात दर्शवली नाही. शिवाय त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या रकान्यात त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख न करता केवळ प्रोफेशनल असा उल्लेख केल्याचे देखील कदम यांनी समोर आणले. वसाणी यांनी कलम ४५२ चा उल्लेख जाणीवपूर्वक दोन्ही शपथपत्रात केला नाही व शिक्षणाची माहिती दिली असा निष्कर्ष काढत कदम यांनी वसाणी यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला. या निर्णया मुळे उपस्थित भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. वसाणी यांचा उमेदवारी अर्जच बाद झाल्याने भाजपाचे पॅनल अडचणीत आले आहे.दरम्यान वसाणी ह्या उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.