शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिका राबवणार सेंटर ऑफ एक्सलेन्स-एज्युकेशन उपक्रम

By धीरज परब | Updated: May 11, 2024 13:21 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. 

मीरारोड - महापालिका शाळांचा व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने  सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सेंटर ऑफ एक्सलेन्स-एज्युकेशन उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या शहरात ३६ शाळा आहेत . सदर शाळांच्या शिक्षकांच्या पगार पासून शाळेच्या व्यवस्थापन , शैक्षणिक साहित्य , शाळांची देखभाल - दुरुस्ती आदींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च दरवर्षी करून देखील शाळा आणि शिक्षणाचा दर्जा मात्र उंचावण्या कडे तत्कालीन नगरसेवकां पासून राजकारणी यांनी दुर्लक्षच केले आहे . 

मागील आयुक्त दिलीप ढोले यांनी पालिका शाळा आणि शिक्षकांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करत विविध उपक्रम राबवले . ढोले हे नियमितपणे शाळांच्या बद्दल बैठका घेऊन आढावा घेत होते . ढोले यांच्या बदली नंतर आलेले आयुक्त संजय काटकर यांनी देखील पालिका शाळांचा दर्जा उंचावण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे . आयुक्त काटकर, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांच्या उपस्थितीत सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत महापालिका शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व सामाजिक संस्था

यांच्याशी चर्चास्पर संवाद साधण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपक्रमातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे.  यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता, भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी सात सामाजिक संस्था सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन या उपक्रमात सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविणे, शारीरिक विकास यासाठी सामाजिक संस्था महत्त्वाचा दुवा म्हणून सक्रिय राहणार आहेत जेणेकरून महापालिका शाळेतील शिक्षकांना त्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. 

यामध्ये सुपर टी २० साठी महापालिकेच्या २० शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या ३ महिन्यात एका शाळेची निवड करून सेंटर ऑफ एक्सलेन्स - एज्युकेशन उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. भविष्यात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी व सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी सांगितले .