शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

मीरा भाईंदर महापालिकेने शहरात केली चार कृत्रिम तलावांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:47 IST

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी ४ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तलावांचे जलप्रदूषण कमी ...

मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी ४ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. तलावांचे जलप्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणून कृत्रिम तलाव केल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

कोविड-१९ मुळे या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याबाबतचे परिपत्रक महानगरपालिका कार्यालयास प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयात गणेशोत्सव साजरा करणेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार प्रभाग समिती क्रमांक १ ते ६ या हद्दीत मूर्ती स्वीकृती केंद्र तयार करण्याचे, तसेच कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

शहरातील तलावात तसेच खाडी व समुद्रात दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. यामध्ये मुख्यतः पीओपी मूर्तींचा समावेश असतो. पीओपीच्या मूर्ती विसर्जित केल्याने तलावातील पाणी दूषित होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात ४ ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मीरा रोडच्या शिवार उद्यानालगत, भाईंदर पूर्वेच्या सुभाषचंद्र बोस मैदानात, भाईंदर पश्चिमेच्या नवघर शंकर नारायण महाविद्यालयासमोर, तर मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्सजवळील जॉगर्स पार्क येथे ही कृत्रिम तलावे निर्माण करण्यात आली आहेत. या तलावांच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी जवळच्या परिसरातील कुंडात किंवा कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्वीकृती केंद्रावर नागरिकांनी नाहक गर्दी करू नये. कोविडच्या नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साधा व पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.