शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

मीरा-भाईंदरला धोकादायक इमारतींच्या यादीचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार केलेली नाही. पालिका आयुक्तांनी पत्र देऊनही प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे धोकादायक इमारतीच जाहीर नसल्याने रहिवासी मृत्यूच्या दाढेत राहत आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेत पूर्वी धोकादायक इमारतींची पडताळणी करून त्या धोकादायक जाहीर करणे व रिकाम्या करून पाडून टाकण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. परंतु, धोकादायक इमारत जाहीर करण्यात तसेच इमारत धोकादायक जाहीर केल्यावर ती अर्थपूर्ण दबावाखाली पुन्हा सुस्थितीत असल्याचे जाहीर केले जाण्याचे प्रकार उघड झाले. यात राजकीय दबावही नेहमीचाच आहे.

इमारत जुनी असली तरी मूळ जमीनमालक म्हणून दुसरेच लोक असल्याने इमारती पाडून कायदेशीर अडचणीही मूळ जमीनमालकास फायदा करून देण्यासाठी निर्माण केल्या जातात. जुन्या इमारती मुळात अनधिकृत किंवा नियमापेक्षा जास्त चटईक्षेत्र वापरून बांधलेल्या आहेत. त्यामुळे परवानगी मिळणे अवघड ठरते. त्यातच जमीनमालकाचे उभे राहणारे वाद पाहता अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारतीत राहणारी शेकडो कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.

गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीत काही प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींचा विभाग प्रभाग अधिकाऱ्यांकडे देण्याचा आग्रह धरला होता. आयुक्तांनीही मान्य करीत धोकादायक इमारतींची जबाबदारी प्रभाग अधिकारी यांच्याकडे दिली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्या रिकाम्या करून घेणे आवश्यक असताना प्रभाग अधिकाऱ्यांनी अद्याप तशी यादीच जाहीर केलेली नाही. आयुक्त दिलीप ढोले यांनी ८ एप्रिलच्या पत्राने सर्व प्रभाग अधिकारी यांना धोकादायक इमारतींची पडताळणी करून यादी जाहीर करणे व त्या रिकाम्या करण्याचे आदेशसुद्धा दिले. परंतु, प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात भाईंदरच्या महेश नगर २ या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रभाग अधिकारी यांची धावपळ उडाली आहे. आता त्यांनी जुन्या इमारतींना पत्र काढून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची पडताळणी व अहवालासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे धोकादायक इमारत असल्यास रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.

रहिवासी राहते घर सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नसतात. कारण इमारत रिकामी करून ती पाडल्यावर त्याच्या पुनर्निर्माणचे काही खरे नसते. अनेक अडचणी येत असतात. शिवाय दुसरीकडे भाड्याने राहणे परवडत नाही. जेणेकरून धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर होत चालला असताना यंदा तर धोकादायक इमारतींची यादीच अजून पालिकेने जाहीर केलेली नाही.