शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरला धोकादायक इमारतींच्या यादीचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार केलेली नाही. पालिका आयुक्तांनी पत्र देऊनही प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे धोकादायक इमारतीच जाहीर नसल्याने रहिवासी मृत्यूच्या दाढेत राहत आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेत पूर्वी धोकादायक इमारतींची पडताळणी करून त्या धोकादायक जाहीर करणे व रिकाम्या करून पाडून टाकण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. परंतु, धोकादायक इमारत जाहीर करण्यात तसेच इमारत धोकादायक जाहीर केल्यावर ती अर्थपूर्ण दबावाखाली पुन्हा सुस्थितीत असल्याचे जाहीर केले जाण्याचे प्रकार उघड झाले. यात राजकीय दबावही नेहमीचाच आहे.

इमारत जुनी असली तरी मूळ जमीनमालक म्हणून दुसरेच लोक असल्याने इमारती पाडून कायदेशीर अडचणीही मूळ जमीनमालकास फायदा करून देण्यासाठी निर्माण केल्या जातात. जुन्या इमारती मुळात अनधिकृत किंवा नियमापेक्षा जास्त चटईक्षेत्र वापरून बांधलेल्या आहेत. त्यामुळे परवानगी मिळणे अवघड ठरते. त्यातच जमीनमालकाचे उभे राहणारे वाद पाहता अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारतीत राहणारी शेकडो कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.

गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीत काही प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींचा विभाग प्रभाग अधिकाऱ्यांकडे देण्याचा आग्रह धरला होता. आयुक्तांनीही मान्य करीत धोकादायक इमारतींची जबाबदारी प्रभाग अधिकारी यांच्याकडे दिली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्या रिकाम्या करून घेणे आवश्यक असताना प्रभाग अधिकाऱ्यांनी अद्याप तशी यादीच जाहीर केलेली नाही. आयुक्त दिलीप ढोले यांनी ८ एप्रिलच्या पत्राने सर्व प्रभाग अधिकारी यांना धोकादायक इमारतींची पडताळणी करून यादी जाहीर करणे व त्या रिकाम्या करण्याचे आदेशसुद्धा दिले. परंतु, प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात भाईंदरच्या महेश नगर २ या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रभाग अधिकारी यांची धावपळ उडाली आहे. आता त्यांनी जुन्या इमारतींना पत्र काढून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची पडताळणी व अहवालासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे धोकादायक इमारत असल्यास रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.

रहिवासी राहते घर सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नसतात. कारण इमारत रिकामी करून ती पाडल्यावर त्याच्या पुनर्निर्माणचे काही खरे नसते. अनेक अडचणी येत असतात. शिवाय दुसरीकडे भाड्याने राहणे परवडत नाही. जेणेकरून धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर होत चालला असताना यंदा तर धोकादायक इमारतींची यादीच अजून पालिकेने जाहीर केलेली नाही.