शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरला धोकादायक इमारतींच्या यादीचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग कार्यालयांच्या बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे अजूनपर्यंत धोकादायक इमारतींची यादीच तयार केलेली नाही. पालिका आयुक्तांनी पत्र देऊनही प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे धोकादायक इमारतीच जाहीर नसल्याने रहिवासी मृत्यूच्या दाढेत राहत आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेत पूर्वी धोकादायक इमारतींची पडताळणी करून त्या धोकादायक जाहीर करणे व रिकाम्या करून पाडून टाकण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. परंतु, धोकादायक इमारत जाहीर करण्यात तसेच इमारत धोकादायक जाहीर केल्यावर ती अर्थपूर्ण दबावाखाली पुन्हा सुस्थितीत असल्याचे जाहीर केले जाण्याचे प्रकार उघड झाले. यात राजकीय दबावही नेहमीचाच आहे.

इमारत जुनी असली तरी मूळ जमीनमालक म्हणून दुसरेच लोक असल्याने इमारती पाडून कायदेशीर अडचणीही मूळ जमीनमालकास फायदा करून देण्यासाठी निर्माण केल्या जातात. जुन्या इमारती मुळात अनधिकृत किंवा नियमापेक्षा जास्त चटईक्षेत्र वापरून बांधलेल्या आहेत. त्यामुळे परवानगी मिळणे अवघड ठरते. त्यातच जमीनमालकाचे उभे राहणारे वाद पाहता अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे इमारतीत राहणारी शेकडो कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. काही इमारतींची प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत.

गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीत काही प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींचा विभाग प्रभाग अधिकाऱ्यांकडे देण्याचा आग्रह धरला होता. आयुक्तांनीही मान्य करीत धोकादायक इमारतींची जबाबदारी प्रभाग अधिकारी यांच्याकडे दिली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्या रिकाम्या करून घेणे आवश्यक असताना प्रभाग अधिकाऱ्यांनी अद्याप तशी यादीच जाहीर केलेली नाही. आयुक्त दिलीप ढोले यांनी ८ एप्रिलच्या पत्राने सर्व प्रभाग अधिकारी यांना धोकादायक इमारतींची पडताळणी करून यादी जाहीर करणे व त्या रिकाम्या करण्याचे आदेशसुद्धा दिले. परंतु, प्रभाग अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात भाईंदरच्या महेश नगर २ या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर प्रभाग अधिकारी यांची धावपळ उडाली आहे. आता त्यांनी जुन्या इमारतींना पत्र काढून स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची पडताळणी व अहवालासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे धोकादायक इमारत असल्यास रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.

रहिवासी राहते घर सोडून दुसरीकडे जाण्यास तयार नसतात. कारण इमारत रिकामी करून ती पाडल्यावर त्याच्या पुनर्निर्माणचे काही खरे नसते. अनेक अडचणी येत असतात. शिवाय दुसरीकडे भाड्याने राहणे परवडत नाही. जेणेकरून धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर होत चालला असताना यंदा तर धोकादायक इमारतींची यादीच अजून पालिकेने जाहीर केलेली नाही.